शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण संपवण्याचा सरकारचा घाट; तरुणांनो, शासन GR ची होळी करा - विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 10:45 IST

ओबीसी आरक्षणावर केवळ सरकारने फार्स केला. तोंडी आश्वासन द्यायचे होते तर बैठक कशासाठी बोलावली? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.

मुंबई – आरक्षण संपवण्याचा घाट सरकार करतंय. ओबीसी तरूणांना आवाहन आहे या जीआरची होळी करा. हा जीआर ओबीसी, एससी, एसटी तरुणांवर अन्याय करणारा आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. जीआर रद्द होत नाही तोपर्यंत कुठल्याही सत्ताधाऱ्यांना गावात फिरकू देऊ नका असंही आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तरुणांना केले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने सुरू केला आहे. आरक्षण संपवण्याची पहिली पायरी सरकार यशस्वीपणे पार पाडत आहे. सरकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे काम सरकार करतेय. विशिष्ट विचारधारेची व्यक्ती कंत्राटी पद्धतीने सरकारच्या इशाऱ्यावर काम करतील. संपूर्ण मेरिट डावलून मर्जीतील माणसांना भरले जाईल आणि आरक्षण संपवले जाईल. हा संपूर्ण खेळ आमच्या ओबीसी नेत्यांना कळत का नाही? असा सवाल त्यांनी विचारला.

तसेच ओबीसी आरक्षणावर केवळ सरकारने फार्स केला. तोंडी आश्वासन द्यायचे होते तर बैठक कशासाठी बोलावली? मी बैठकीला गेलो नाही, अनेक ओबीसी आमदार जे आंदोलनात सक्रीय होते ते गेले नाहीत. तोंडी आश्वासनावर तोंडाला पाने पुसण्याचे काम कालच्या बैठकीत झाले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं म्हणणारे संघटनेचे नेते कालच्या बैठकीत तोंडी आश्वासनावर कसे समाधानी झाले हा खरा प्रश्न आहे असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

इतकेच नाही तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत. त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटीही घेतली. आतापर्यंत मराठवाड्यात २८ लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र दिले आहेत. हे काम झपाट्याने सुरू आहे. त्यात दुसरीकडे सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे कामही सुरू आहे. मग या बैठकीचा खटाटोप सरकार का करतंय याचे उत्तर ओबीसी समाजाने विचारले पाहिजे असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

निवडणूक आयोग भाजपाच्या खिशात

खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? हा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू आहे. अजित पवार-शरद पवार यांच्या याचिकांवर ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मात्र तत्पूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपासोबत सत्तेत असणारे पक्ष निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतात अशी टीका करत अजित पवार, एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणूक आयोग खिशात घेऊन भाजपा फिरते. त्यामुळे भाजपासोबत जो पक्ष जाईल, मग २५ गेले, ३० गेले उद्या २ लोकंही गेले तरी पक्ष आणि चिन्हावर दावा करतील. देश हुकुमशाही आणि मनमानी पद्धतीने चालला आहे. त्यामुळे इथं काहीही होऊ शकतो. काहीही करू शकतो. जो कोणी पक्ष भाजपासोबत जाईल. उद्या २ लोकंही गेले तरी त्यांना निवडणूक आयोग पक्ष, चिन्ह दिल्यास नवल वाटू नये असं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपा