शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र राज्यात अशांतता निर्माण व्हावी असा एकमेव हेतू राज्य सरकारचा आहे. गृहमंत्री आणि गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही? फडणवीस दिसत नाही. निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत देवेंद्र फडणवीस काम करतायेत. ती कारणे शोधावी लागतील. ते जाहीरपणे सांगणार नाही. संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली ते सरकारचे अपयश आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर लावला आहे. 

ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले की, राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. विशेषत: मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची जाणीव करून देतायेत. बसू का, वाचू का, डोळे उघडू का, खाऊ का यालाच सर्वोच्च न्यायालयाने वेगळ्या शब्दात ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात, धार्मिक-जातीय तणाव वाढावेत. अस्थिरता राहावी असं काम सरकार करतेय. राज्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी शिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतायेत. सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत. जनतेचे डोके ठिकाणावर आहे. आता तरी सरकारचे डोके ठिकाणावर यावे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं, गेले काही महिने राज्यातील जनता हेच म्हणते. यामागे तरी आम्ही नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरकारविषयी हे निरिक्षण आहे त्यावरून या सरकारची प्रतिष्ठा, पत काय आहे आणि हे सरकार कशापद्धतीने आले अन् काम करतेय हे एका वाक्यातून स्पष्ट झाले. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही राज्य सरकारविरोधात नपुंसक हा शब्द वापरला नव्हता असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादामुळे २ एप्रिलला होणारी मविआची सभा होणार का असा प्रश्न संजय राऊतांना विचारला असता त्यावर महाविकास आघाडीची सभा दणक्यात होतील. शिवसेनेची सभाही होईल. खेड, मालेगाव सभेनंतर आता ठाकरेंची पुढील सभा पाचोऱ्यात, विदर्भात होईल. त्याची तयारी सुरू आहे अशी माहिती राऊतांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस