शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र राज्यात अशांतता निर्माण व्हावी असा एकमेव हेतू राज्य सरकारचा आहे. गृहमंत्री आणि गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही? फडणवीस दिसत नाही. निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत देवेंद्र फडणवीस काम करतायेत. ती कारणे शोधावी लागतील. ते जाहीरपणे सांगणार नाही. संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली ते सरकारचे अपयश आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर लावला आहे. 

ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले की, राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. विशेषत: मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची जाणीव करून देतायेत. बसू का, वाचू का, डोळे उघडू का, खाऊ का यालाच सर्वोच्च न्यायालयाने वेगळ्या शब्दात ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात, धार्मिक-जातीय तणाव वाढावेत. अस्थिरता राहावी असं काम सरकार करतेय. राज्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी शिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतायेत. सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत. जनतेचे डोके ठिकाणावर आहे. आता तरी सरकारचे डोके ठिकाणावर यावे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं, गेले काही महिने राज्यातील जनता हेच म्हणते. यामागे तरी आम्ही नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरकारविषयी हे निरिक्षण आहे त्यावरून या सरकारची प्रतिष्ठा, पत काय आहे आणि हे सरकार कशापद्धतीने आले अन् काम करतेय हे एका वाक्यातून स्पष्ट झाले. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही राज्य सरकारविरोधात नपुंसक हा शब्द वापरला नव्हता असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादामुळे २ एप्रिलला होणारी मविआची सभा होणार का असा प्रश्न संजय राऊतांना विचारला असता त्यावर महाविकास आघाडीची सभा दणक्यात होतील. शिवसेनेची सभाही होईल. खेड, मालेगाव सभेनंतर आता ठाकरेंची पुढील सभा पाचोऱ्यात, विदर्भात होईल. त्याची तयारी सुरू आहे अशी माहिती राऊतांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस