शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

​५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:21 IST

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले. 

मुंबई  - मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केले. परतीच्या पावसाचा हा काळ आहे. वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पिकावर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतमालाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. मुंबईसह कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याचेही फुंडकर यांनी सांगितले.  याकाळात वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वत: चा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली तसेच विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ वीज कोसळण्याच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे पावसाच्या काळात असा ठिकाणी थांबू नये. कृषीविभागाकडून शेतक-यांना एसएमएसद्वारे अतिवृष्टीबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच पालकमंत्र्यांनाही आपापल्या जिल्ह्यात याबाबत आवाहन करण्यास सांगण्यात आल्याचेही फुंडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर