शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:45 IST

आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत.

मुंबई : आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत. मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात होणार आहे. देश अत्यवस्थ अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोमात जाऊ शकतो. त्यावर उपाय करण्याऐवजी सरकार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात गर्क आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील हिंसाचार या कटाचाच भाग होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो, तसेच मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील एक एक कंपनी विकून कारभार हाकत आहे. सरकार मुद्दाम जुनी मनुस्मृतीची व्यवस्था आणण्याच्या हेतूने सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या दुबळे बनविण्याचा प्रयत्न करत आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालणे अवघड काम असते. त्यात आजवर केंद्र सरकारने उचललेली पावले हीदेशाला कर्जाच्या सापळ्यात अडकवणारी आहेत. सप्टेंबर २०१९अखेर देशावरील कर्ज ५५७.५ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे वाढले होते. कर्जाचे हे ओझे चिंताजनक आहे. आर्थिक संकटाशी सामना करण्याचा उपाय या सरकारकडे नाही, हेच या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. सर्व अपयश उघड होऊ नये म्हणून देशात सरकारला यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.>शहरी नक्षलवादी संज्ञा भाजपने जन्माला घातलीदेशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याला झुगारून उभे राहण्याची वेळ आली आहे. संघ आणि भाजपच्या तत्त्वातच हिंसा आहे. याच मार्गाने या संघटना वाढल्या. शहरी नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून, संघच देशातील सर्वात मोठा आतंकवादी आहे, असेही आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचाच असेल असा दावा करतानाच वाशिममध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर