शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:45 IST

आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत.

मुंबई : आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत. मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात होणार आहे. देश अत्यवस्थ अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोमात जाऊ शकतो. त्यावर उपाय करण्याऐवजी सरकार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात गर्क आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील हिंसाचार या कटाचाच भाग होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो, तसेच मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील एक एक कंपनी विकून कारभार हाकत आहे. सरकार मुद्दाम जुनी मनुस्मृतीची व्यवस्था आणण्याच्या हेतूने सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या दुबळे बनविण्याचा प्रयत्न करत आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालणे अवघड काम असते. त्यात आजवर केंद्र सरकारने उचललेली पावले हीदेशाला कर्जाच्या सापळ्यात अडकवणारी आहेत. सप्टेंबर २०१९अखेर देशावरील कर्ज ५५७.५ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे वाढले होते. कर्जाचे हे ओझे चिंताजनक आहे. आर्थिक संकटाशी सामना करण्याचा उपाय या सरकारकडे नाही, हेच या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. सर्व अपयश उघड होऊ नये म्हणून देशात सरकारला यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.>शहरी नक्षलवादी संज्ञा भाजपने जन्माला घातलीदेशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याला झुगारून उभे राहण्याची वेळ आली आहे. संघ आणि भाजपच्या तत्त्वातच हिंसा आहे. याच मार्गाने या संघटना वाढल्या. शहरी नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून, संघच देशातील सर्वात मोठा आतंकवादी आहे, असेही आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचाच असेल असा दावा करतानाच वाशिममध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर