शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:45 IST

आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत.

मुंबई : आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत. मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात होणार आहे. देश अत्यवस्थ अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोमात जाऊ शकतो. त्यावर उपाय करण्याऐवजी सरकार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात गर्क आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील हिंसाचार या कटाचाच भाग होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो, तसेच मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील एक एक कंपनी विकून कारभार हाकत आहे. सरकार मुद्दाम जुनी मनुस्मृतीची व्यवस्था आणण्याच्या हेतूने सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या दुबळे बनविण्याचा प्रयत्न करत आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालणे अवघड काम असते. त्यात आजवर केंद्र सरकारने उचललेली पावले हीदेशाला कर्जाच्या सापळ्यात अडकवणारी आहेत. सप्टेंबर २०१९अखेर देशावरील कर्ज ५५७.५ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे वाढले होते. कर्जाचे हे ओझे चिंताजनक आहे. आर्थिक संकटाशी सामना करण्याचा उपाय या सरकारकडे नाही, हेच या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. सर्व अपयश उघड होऊ नये म्हणून देशात सरकारला यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.>शहरी नक्षलवादी संज्ञा भाजपने जन्माला घातलीदेशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याला झुगारून उभे राहण्याची वेळ आली आहे. संघ आणि भाजपच्या तत्त्वातच हिंसा आहे. याच मार्गाने या संघटना वाढल्या. शहरी नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून, संघच देशातील सर्वात मोठा आतंकवादी आहे, असेही आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचाच असेल असा दावा करतानाच वाशिममध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर