शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

सनदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:28 IST

बहुतांश सनदी अधिका-यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केल्या गेल्या आहेत.

सनदी अधिका-यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागावे याकरिता त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच सरकारतर्फे बदली हे अस्त्र म्हणून वापरले जात आहे अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.या संदर्भात निषेध व्यक्त करून सावंत म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून बहुतांश सनदी अधिका-यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केल्या गेल्या आहेत. सनदी अधिका-यांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांना त्या पदावर किमान दोन वर्ष पूर्ण करून दिली पाहिजेत असा नियम असताना अनेक सनदी अधिका-यांना एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करून दिला जात नाही. आजच सरकारने राज्यातील २५ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पदावर एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण न केलेल्या अधिका-यांचाही समावेश आहे. गेल्या चार वर्षातील शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे आकडे पाहिले तर तो जागतिक विक्रम ठरेल असा टोला लगावून हा अधिकाऱ्यांना सरकारचे बोलके बाहुले बनवण्याचा प्रयत्न आहे असे सावंत म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार