शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

सरकारने मस्तीत वागू नये, ज्या वेगानं सत्तेत आले त्याच वेगाने कोसळणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:02 IST

 सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे.

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपा सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे त्याच वेगाने कोसळेल असं भाकीत वर्तवलं आहे. 

शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. सरकारने जास्त मस्तीत वागू नये. जनता ही मस्ती उतरवू शकते. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही.  राजकारणाची जी संस्कृती महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत पाहिली आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.  

यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या दडपशाहीवरही जोरदार टीका केली.  सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भाजपा सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे, त्याच वेगाने कोसळेल असं पवार म्हणाले.

भाजपा सरकारच्या धोरणांवर जोरदार देखील त्यांनी टीका केली. जीएसटी आणि नोटबंदीवर टीका करताना ते म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारची धोरणं ही केवळ उद्योगपतींचं भलं करणारी आहेत. राज्यातही सरकारची शेतकऱ्यांबाबतची धोरणं चुकत आहेत असं म्हणत त्यांनी शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार