शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

निवडणूक वर्षात सरकारला आठवले ‘गांधीमहात्म्य’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:45 AM

वर्षभर भरगच्च कार्यक्रम; गांधीविचारांचा प्रचार आणि प्रसार करणार

- यदु जोशीमुंबई : काही महिन्यांत येऊ घातलेली लोकसभा निवडणूक आणि सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रीय पिता महात्मा गांधी यांची आठवण झाली आहे. गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत ‘गांधी महात्म्या’ची पारायणं करण्याचा ‘भरगच्च कार्यक्रम’ सरकारने आखला आहे.गांधीविचार आणि सर्वोदयींना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ परिवाराने ‘आपलं’ मानलंच नाही, आजवर कधीच संघशाखेत गांधी जयंती साजरी झाली नाही, असे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर होत आले आहेत. गांधीहत्येचं पातकही संघाच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ‘स्वच्छता अभियाना’च्या माध्यमातून गांधींना आपलंस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिका, चीन आणि जपानच्या राष्टÑप्रमुखांना साबरमती आश्रमाची भेट घडवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेशी पाहुण्यांना सूतकताईचे महत्व पटवून दिले.येत्या २आॅक्टोबर रोजी गाधींजींची १५० वी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून केंद्र आणि राज्य सरकार वर्षभर भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रम राबविणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदस्य आहेत. राज्य सरकारने देखील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोजन समिती स्थापन केलीजाणार असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समितीच्या सहअध्यक्ष असतील. ही समिती कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करेल. त्यांची अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल.येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात ठिकठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. विविध शहरे, गावांमध्ये असलेल्या महात्मा गांधी मार्गांवर ग्रामोद्योगातून स्वयंरोजगार या विषयांवर आठवड्यातून दोन दिवस प्रदर्शने भरविण्यात येतील.

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, विपणन व व्यवसाय विकास, खादीचे महत्त्व या विषयांवर परिसंवाद होतील. खादी आणि ग्रामोद्योगातील वस्तूंच्या विक्रीसाठी विभागीय पातळीवर महाखादी प्रोत्साहन व विक्री डेपो उभारण्यात येतील. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सौरऊर्जा चरख्यांचे वाटप केले जाईल. त्यासाठी सरकारने आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.असे असतील ‘सर्वोदयी’ उपक्रम‘एक विद्यार्थी, एक शिक्षक’या योजनेंतर्गत एक शिक्षक अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यास दत्तक घेतील. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधीजींचे कार्य आणि त्यांचे विचार या बाबत मार्गदर्शन केले जाईल.गांधीजींचे वास्तव्य राहिलेले मुंबईतील मणिभवन, आगा खान पॅलेस आणि पुण्यातील येरवडा कारागृहात विशेष सुविधा पुरविण्यात येतील.‘गांधी फॉर टुमारो’ अंतर्गत महात्मा गांधी मानव संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल.‘महात्मा गांधी १५०’ असे मोबाइल अ‍ॅप तयार करून त्याच्या माध्यमातून गांधीविचारांचा प्रसार करण्यात येणार आहे.150 व्या जयंतीनिमित्त येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात ठिकठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपा