शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 06:30 IST

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर सात साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली :मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट (७/११चे बॉम्बस्फोट) झाले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींची पुरावे निर्णायक नसल्याच्या कारणावरून सोमवारी निर्दोष मुक्तता केली होती. या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी, २४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. के. विनोद चंद्रन आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने मंगळवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटला निकालाबाबत केलेल्या तातडीच्या उल्लेखाची दखल घेतली आणि या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी घेण्याचे ठरवले. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात विशेष सुट्टीकालीन याचिका तयार असून तिची उद्या, बुधवारी दखल घ्यावी. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हायला हवी. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे आवश्यक आहे. त्यावर सरन्यायाधीश गवई यांनी या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांचाही उल्लेख केला.मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बॉम्बचा वापर करण्यात आला, याची माहितीच तपास यंत्रणेने सादर केलेली नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ, आरोपींकडून जप्त केलेले साहित्य व कबुलीजबाब यांच्या हस्ते या प्रकरणाचा खटला चालविण्यात आला. पण आरोपींनीच बॉम्बस्फोट घडविला, हे पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सिद्ध करू शकलेले नाही. त्यामुळे या खटल्यातील १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या आरोपींपैकी ५ जणांना विशेष न्यायालयाने फाशीची तर उर्वरित ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. फाशीची शिक्षा सुनावलेल्यांपैकी एकाचा २०२१मध्ये मृत्यू झाला. ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर सात साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात १८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने २०१५ साली दिलेल्या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल झाले. या प्रकरणातील आरोपींना सुनावलेल्या शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करून त्यांची मुक्तता केली. या निकालामुळे सदर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मोठा धक्का बसला आहे. या पथकाने न्यायालयात दावा केला होता की, २००६ साली मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या (एलइटी) सदस्यांशी हातमिळवणी करून साखळी बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला.जबाब घेताना शारीरिक छळ केल्याचा आरोपींचा दावा११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे निर्णायक नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच सरकारी पक्षाने सादर केलेले सर्व कबुलीजबाब उच्च न्यायालयाने अमान्य केले. तपास यंत्रणेने जबाब घेताना आरोपींचा शारीरिक छळ केला हे त्यांनी सिद्ध केल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईBombsस्फोटकेBlastस्फोटCourtन्यायालय