शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सरकारनेच काढला सहकार कायदा मोडीत, संचालक मंडळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:46 AM

राज्यातील २२ जिल्हा सहकारी बँका, ८ हजार सोसायट्या तसेच अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी ते जून या कालावधीत संपत होती.

- सुधीर लंकेअहमदनगर : वेगवेगळी कारणे देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. मात्र, विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची तरतूदच कायद्यात नसल्याने या संस्थांवर तातडीने प्रशासक नेमणे गरजेचे होते. ही त्रुटी लक्षात येताच सरकारने अधिसूचना काढत मुदत संपलेल्या संचालक मंडळांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. सहकारावर असा वरदहस्त दाखविताना ग्रामपंचायतींवर मात्र प्रशासक नेमण्याचे धोरण घेण्यात आले आहे.राज्यातील २२ जिल्हा सहकारी बँका, ८ हजार सोसायट्या तसेच अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी ते जून या कालावधीत संपत होती. मात्र कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सहकारातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने जानेवारीत घेतला. उच्च न्यायालयाने १३ मार्च रोजी या आदेशास स्थगिती दिली. मात्र त्यानंतर सरकारने कोविडचे कारण देत दोनदा निवडणुका पुढे ढकलल्या. सहकारी संस्था अधिनियम कलम ७३ कनुसार सरकार नैसर्गिक आपत्तीत निवडणुका पुढे ढकलू शकते. मात्र, संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची तरतूद यात नाही. संचालक मंडळाची मुदत संपताच तेथे प्रशासक यायला हवा.का दिली मुदतवाढ?९७ व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांचे क्रियाशील सभासदच जिल्हा सहकारी बँकांचे मतदार असतात. मात्र, अनेक सहकारी संस्था थकबाकीदार असल्याने त्यांच्या पंच कमिटीत मतदानाचे ठराव होऊ शकले नाहीत.कर्जमुक्तीनंतर या संस्था आपोआप थकबाकीतून बाहेर पडणार होत्या. त्यामुळे सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची चाल खेळली असा संशय आहे.प्रशासक नियुक्त केल्यास अनेक जिल्हा सहकारी बँकांमधून साखर कारखान्यांना कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळेही प्रशासक नियुक्त करण्यात आले नाहीत, असे बोलले जाते.सरकारने निवडणुकांना मुदतवाढ दिली, संचालक मंडळाला नव्हे. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर तातडीने प्रशासक यायला हवे होते. राज्यपालांनी १० जुलैला अधिसूचना काढून कायद्यात दुरुस्ती केली. मात्र तत्पूर्वीच मुदत संपलेल्या संचालक मंडळांचे काय? याबाबत शेतकरी संघटनेची याचिका उच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. - अ‍ॅड. अजित काळेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना जानेवारीपासून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर संचालक मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत १० जुलैला अधिसूचना काढली आहे.- अनिल कवडे,सहकार आयुक्त