शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सरकारने सिंचनाची आकडेवारी दडवली!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:26 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात किती क्षेत्र सिंचनाखाली आले आणि त्यासाठी किती खर्च झाला, याची कोणतीही आकडेवारी २०१७-१८ च्या आर्थिक पहाणी अहवालात देण्यात आलेली नाही.

मुंबई  -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात किती क्षेत्र सिंचनाखाली आले आणि त्यासाठी किती खर्च झाला, याची कोणतीही आकडेवारी २०१७-१८ च्या आर्थिक पहाणी अहवालात देण्यात आलेली नाही.राज्याच्या २०११-१२ या वर्षातील आर्थिक पाहणी अहवालात मागील १० वर्षात राज्यातील सिंचित क्षेत्र फक्त ०.१ टक्क्यांनी वाढल्याचा उल्लेख होता. त्यावरुन विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने काँग्रेस-राष्टÑवादी सरकारला सळो की पळो करून सोडले होते. या टिकेमुळे आघाडी सरकारने जलसंपदा विभागावर श्वेतपत्रिका काढली. १५ वर्षात झालेला खर्च, निर्माण झालेली सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र याची आकडेवारी श्वेतपत्रिकेत देण्यात आली होती. मात्र याच आकडेवारीचा आधार घेत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला होता. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या पराभवास हा आरोपही कारणीभूत ठरला.भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर जे प्रकल्प ७५ ते ९० टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना निधी देऊन ते पूर्ण केले जातील, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र गेल्या साडेतीन वर्षात किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले, किती सिंचन क्षमता निर्माण झाली आणि त्यावर किती खर्च झाला, याची आकडेवारीच सरकारने दडवून ठेवली आहे. यावषीच्या आर्थिक पाहणी अहवालातही सिंचनासंदर्भात कोणतीही आकडेवारी ‘उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्यात आले आहे.शिवाय, पहाणी अहवालातील आकडे संक्षिप्त स्वरुपात असल्याने बेरजा जुळतीलच असे नाही, अशी तळटीप देऊन संभाव्य आरोपातून सुटका करून घेतली आहे.

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्र