शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

राज्यातील सरकार स्थिर...; अजित पवारांच्या विधानाला जयंत पाटलांनीही दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 19:15 IST

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपाची खेळी आहे असं जयंत पाटील म्हणाले.

नागपूर - सरकारकडे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार अस्थिर नाही हे वास्तव आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय होणार, तेव्हा काय परिस्थिती असेल त्यावर आता कुणालाही काही सांगता येणार नाही. परंतु सरकार स्थिर असताना ते अस्थिर आहे असं बोलणेही योग्य नाही. खरे बोलले तरी या राज्यात शिक्षा होते असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, १६ आमदार अपात्र झाले तरीही जेवढी संख्या लागेल तेवढी सरकारकडे आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना लाखोली वाहून जे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, ते आज त्यांच्या येण्याची वाट पाहतायेत त्याचे कौतुक वाटते. गुलाबराव पाटील असो वा शिवसेनेतील बाहेर गेलेले जे सदस्य आहेत. भाजपाकडे जाणारी वक्तव्ये त्यांनी आठवली तर आपल्याला आश्चर्य वाटेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपाची खेळी आहे. महाविकास आघाडीची सभा लोकांना नव्या मुद्द्याची माहिती देणारी असेल. आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन सभा आयोजित केली आहे. मविआचे घटक पक्ष सभेला उपस्थित राहतील. सभा वेळेत व्हावी यासाठी प्रत्येक पक्षाकडून २ सदस्य बोलतील हे ठरले आहेत. संभाजीनगरला २ वक्ते बोलले आहेत. आज कोण बोलणार हे थोड्यावेळाने ठरेल असंही जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीत मतभेदएकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकार स्थिर आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र केले तरी बहुमताची संख्याही कमी होईल. तितके संख्याबळ भाजपा-शिंदेंकडे आहे त्यामुळे सरकार स्थिर असल्याचे माझे मत आहे असं म्हटलं. तर सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र केल्यानंतर सरकार कोसळेल, वेळ आल्यावर गणित सांगू असं विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. त्याचसोबत अजित पवारांचा अंदाज चुकणार असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी