शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही; कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 18:10 IST

सांगोल्यात विनायक राऊतांनी दावा केला

विठ्ठल खेळगी

सोलापूर : ईडीचा वापर करून विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, असा दावा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला. रविवारी सांगोला येथे शिवसेनेची सभा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना नामशेष करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, अशा प्रकारची धरपकड कधीही झाली नाही. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यासाठी ईडीचा पुरेपूर वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या पुढच्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढण्याचे आज तरी ठरले नाही, परंतु आजतरी महाविकास आघाडी एकत्र आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अशाच पद्धतीने निर्णय होईल. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे ते मोठे नाहीत. शिवसैनिकच त्यांना त्यांची जागा दाखवतील, त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली.

नॉट ओके...शिवसेना विल बी ओके

शहाजीबापूसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात विनोद करू शकतो पण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही हे तिथल्या मतदारांनी ठामपणे सांगितले आहे. आता विद्यार्थीही म्हणतात "नॉट ओके, शिवसेना विल बी ओके" सांगोला मतदारसंघात सगळीकडे भगवाच दिसणार आहे असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे