शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही; कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 18:10 IST

सांगोल्यात विनायक राऊतांनी दावा केला

विठ्ठल खेळगी

सोलापूर : ईडीचा वापर करून विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, असा दावा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला. रविवारी सांगोला येथे शिवसेनेची सभा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना नामशेष करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, अशा प्रकारची धरपकड कधीही झाली नाही. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यासाठी ईडीचा पुरेपूर वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या पुढच्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढण्याचे आज तरी ठरले नाही, परंतु आजतरी महाविकास आघाडी एकत्र आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अशाच पद्धतीने निर्णय होईल. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे ते मोठे नाहीत. शिवसैनिकच त्यांना त्यांची जागा दाखवतील, त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली.

नॉट ओके...शिवसेना विल बी ओके

शहाजीबापूसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात विनोद करू शकतो पण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही हे तिथल्या मतदारांनी ठामपणे सांगितले आहे. आता विद्यार्थीही म्हणतात "नॉट ओके, शिवसेना विल बी ओके" सांगोला मतदारसंघात सगळीकडे भगवाच दिसणार आहे असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे