शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

सरकारने आश्वासन पाळले नाही; मराठा क्रांती मोर्चा पुन्हा उपोषणाला बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 10:46 IST

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तत्काळ कार्यान्वित करून जिल्हास्तरावर संस्थेचे केंद्र व कार्यालय सुरू करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

- चेतन ननावरे

मुंबई - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तत्काळ कार्यान्वित करून जिल्हास्तरावर संस्थेचे केंद्र व कार्यालय सुरू करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. सारथीशिवाय मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे व आंदोलनात मृत पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नसल्याने उपोषणाला बसत असल्याची माहिती प्राध्यापक संभाजी पाटील यांनी दिली आहे.

पाटील यांनी सांगितले की, याआधी ३० मे ते ६ जून २०१६ दरम्यान आणि ३० मे ते ४ जून २०१७ या कालावधीत केलेल्या उपोषणादरम्यान राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सारथी कार्यान्वित करण्याचे व अंमलबजावणी करण्याचे  आश्वासन दिले होते. त्यानंतर पुन्हा २९ सप्टेंबर २०१८ रोजी केलेल्या एक दिवसीय उपोषणातही २५ ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीतही सरकारने आश्वासन पूर्ण न केल्याने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने रणजीत पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात मराठा आरक्षणासह सारथी संस्था, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह कार्यान्वित करण्याचे नमूद केले होते. मात्र लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन वर्षानंतर ही सारखी संस्था उद्घाटन सोहळा सोडल्‍यास कोणतेही कामकाज सुरू नसल्याचा आरोप सकल मराठा क्रांती महामोर्चाने केला आहे. परिणामी सारथी संस्थेवर आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून सदानंद मोरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून केवळ मराठा समाजाला बिनव्याजी कर्ज देत अनुदान देण्यात यावे, मराठा विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात योणारी जिल्हानिहाय वस्तीगृह संस्थांकडे न देता इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांप्रमाणे स्वतः शासनाने ती चालवावीत, अशा विविध मागण्या सकल मराठा क्रांती महामोर्चाने केल्या आहेत.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtraमहाराष्ट्रagitationआंदोलन