शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

सरकारने बढत्यांमधील आरक्षण ठेवले कायम

By यदू जोशी | Updated: September 2, 2017 06:13 IST

सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट २०१७ रोजी शासकीय कर्मचाºयांच्या बढत्यांमधील आरक्षण रद्द केले होते. तथापि, राज्य सरकारला या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता यावे यासाठी उच्च न्यायालयाने आपला हा आदेश १२ आठवठ्यांसाठी तहकूब ठेवला आहे.उच्च न्यायालयाने आपल्याच आदेशाला तहकुबी दिलेली असल्याने बढत्यांमधील आरक्षणावर कुठलीही स्थगिती नाही, अशी भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. या संदर्भातील निकालाच्या अधीन राहून आम्ही बढत्या देत आहोत. सामान्य प्रशासनचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यास दुजोरा दिला.या विषयाबाबत विविध विभागांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. काही विभाग आरक्षणानुसार बढत्यांचे प्रस्ताव देत आहेत तर काहींनी ते रोखले आहेत. काहींनी सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला मागितला आहे. पण ३१ आॅगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागानेच आरक्षणाच्या आधारे बढत्यांचे आदेश काढले. सहकार, महसूल, गृह, ग्रामविकास व जलसंधारण विभागातील मागासवर्गीय पाच कक्ष अधिकाºयांना अवर सचिव म्हणून बढती देण्यात आली.समाधान आणि नाराजी असा परस्परविरोधी सूरराज्य शासनाच्या या भूमिकेवर कर्मचारी, अधिकाºयांमध्ये समाधान आणि नाराजी असा परस्परविरोधी सूर आहेत. दोन्ही बाजूच्या अधिकाºयांच्या शिष्टमंडळांनी आपापाली भूमिका वरिष्ठांकडे प्रत्यक्ष भेटून व निवेदनांद्वारे मांडली आहे. मंत्रालयात हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. उच्च न्यायालयाने निकाल दिलेला असताना आणि राज्य शासन अद्याप सर्वोच्च न्यायालयात गेलेले नसताना आरक्षण कायम कसे काय ठेवले जाऊ शकते, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर, उच्च न्यायालयाने आपल्याच आदेशाला स्थगिती दिलेली असल्याने बढत्यांमधील आरक्षण कायम आहे आणि उच्च न्यायालयानेही तसे स्पष्ट केलेले होते, असे समर्थकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालय