शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सरकारने बढत्यांमधील आरक्षण ठेवले कायम

By यदू जोशी | Updated: September 2, 2017 06:13 IST

सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट २०१७ रोजी शासकीय कर्मचाºयांच्या बढत्यांमधील आरक्षण रद्द केले होते. तथापि, राज्य सरकारला या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता यावे यासाठी उच्च न्यायालयाने आपला हा आदेश १२ आठवठ्यांसाठी तहकूब ठेवला आहे.उच्च न्यायालयाने आपल्याच आदेशाला तहकुबी दिलेली असल्याने बढत्यांमधील आरक्षणावर कुठलीही स्थगिती नाही, अशी भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. या संदर्भातील निकालाच्या अधीन राहून आम्ही बढत्या देत आहोत. सामान्य प्रशासनचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यास दुजोरा दिला.या विषयाबाबत विविध विभागांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. काही विभाग आरक्षणानुसार बढत्यांचे प्रस्ताव देत आहेत तर काहींनी ते रोखले आहेत. काहींनी सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला मागितला आहे. पण ३१ आॅगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागानेच आरक्षणाच्या आधारे बढत्यांचे आदेश काढले. सहकार, महसूल, गृह, ग्रामविकास व जलसंधारण विभागातील मागासवर्गीय पाच कक्ष अधिकाºयांना अवर सचिव म्हणून बढती देण्यात आली.समाधान आणि नाराजी असा परस्परविरोधी सूरराज्य शासनाच्या या भूमिकेवर कर्मचारी, अधिकाºयांमध्ये समाधान आणि नाराजी असा परस्परविरोधी सूर आहेत. दोन्ही बाजूच्या अधिकाºयांच्या शिष्टमंडळांनी आपापाली भूमिका वरिष्ठांकडे प्रत्यक्ष भेटून व निवेदनांद्वारे मांडली आहे. मंत्रालयात हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. उच्च न्यायालयाने निकाल दिलेला असताना आणि राज्य शासन अद्याप सर्वोच्च न्यायालयात गेलेले नसताना आरक्षण कायम कसे काय ठेवले जाऊ शकते, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर, उच्च न्यायालयाने आपल्याच आदेशाला स्थगिती दिलेली असल्याने बढत्यांमधील आरक्षण कायम आहे आणि उच्च न्यायालयानेही तसे स्पष्ट केलेले होते, असे समर्थकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालय