शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सरकारी अनुदान आले, शेतकरी मात्र सापडेनात! लाभार्थी गेले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:42 IST

कोट्यवधीचे अनुदान पडून, अनुदानाचा लाभ देण्यासाठी संस्था लाभार्थींचा शोध घेत आहेत; परंतु दोन महिन्यांपासून १ हजार २५ शेतकऱ्यांचा पत्ताच लागला नाही़

हरी मोकाशे 

लातूर : हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सन २०१७- १८ मध्ये तूर, हरभरा खरेदी न होऊ शकलेल्या पात्र २ हजार ९२५ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३ कोटी २६ लाख २५ हजार २४४ रुपये उपलब्ध झाले़ मात्र, दोन महिने उलटले तरी अनुदानाचा लाभ देण्यासाठी १ हजार २५ शेतकरी प्रशासनास सापडेनासे झाले आहेत़

सन २०१७- १८ मध्ये तूर आणि हरभºयाचे चांगले उत्पादन झाल्याने बाजारपेठेत दर घसरले होते़ परिणामी, शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर मिळाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर हा शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती आणि खरेदी न झालेल्या शेतकºयांसाठी राज्य सरकारने प्रति क्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करून ही रक्कम नाफेडकडे वर्ग केली होती़

जिल्ह्यातील १ हजार १६० तूर उत्पादकांसाठी ९८ लाख ४० हजार ३२४ तर १ हजार ७६५ हरभरा उत्पादक शेतकºयांसाठी २ कोटी २७ लाख ८४ हजार ९२० रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते़ या पात्र शेतकºयांच्या याद्या तालुका पातळीवरील खरेदी केलेल्या शेतकरी संस्थांकडे पाठविण्यात आल्या होत्या़

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकºयांनी बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डची प्रत देणे गरजेचे आहे़ दरम्यान, नाफेडने नियुक्त केलेल्या संस्थांमार्फत आजपर्यंत ६३९ तूर उत्पादक शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना ५५ लाख १४ हजार २८३ रुपयांचे तर १ हजार २६१ हरभरा उत्पादकांना १ कोटी ६३ लाख ७८ हजार ७०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेआहे़दोन महिन्यांपासून लाभार्थींचा शोधअनुदानाचा लाभ देण्यासाठी संस्था लाभार्थींचा शोध घेत आहेत; परंतु दोन महिन्यांपासून १ हजार २५ शेतकºयांचा पत्ताच लागला नाही़ तूर, हरभरा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला आहे़ आतापर्यंत १९०० शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे़ अद्याप १ हजार २५ शेतकºयांचा शोध सुरू आहे़ त्यामुळे १ कोटी ७ लाख ३२ हजार १६१ रुपये पडून आहेत, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश हेमके यांनी सांगितले़

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी