शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

१४ हजार कोटींचा सरकारी नाकर्तेपणा!

By admin | Updated: May 29, 2014 03:15 IST

जलसिंचन घोटाळ्याच्या श्वेतपत्रिकेने राज्यभर रान पेटवले. श्वेतपत्रिका आल्यापासून आजतागायत प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता द्यायची कोणी, याचा निर्णय घेण्यास मंत्री-सचिव समिती आणि मंत्रिमंडळ तयार नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई - जलसिंचन घोटाळ्याच्या श्वेतपत्रिकेने राज्यभर रान पेटवले. श्वेतपत्रिका आल्यापासून आजतागायत प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता द्यायची कोणी, याचा निर्णय घेण्यास मंत्री-सचिव समिती आणि मंत्रिमंडळ तयार नाही. या नाकर्तेपणामुळे गेल्या दोन वर्षांत राज्यात ५५०० कोटी रुपये खर्चाविना पडून आहेत, तर दुसरीकडे प्रकल्पांच्या किमती १४ हजार कोटींनी वाढल्या आहेत. सरकारचा हा नाकर्तेपणा राज्याला मात्र मोठ्या आर्थिक खड्ड्यात नेणारा ठरला आहे. श्वेतपत्रिका आली त्या वेळी राज्यात लहान-मोठे मिळून ६७० प्रकल्प प्रलंबित होते, ज्यासाठी ७८,४५१ कोटी रुपये लागणार होते. त्यातले २१८ प्रकल्प बाजूला केले गेले. आज शिल्लक ४५२ प्रकल्पांसाठी ७०,७५० कोटी रुपये लागणार आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत सगळी कामे ठप्प झाली आहेत. मूळ अंदाजात वर्षाला १० टक्के वाढ होते. यानुसार, ७० हजार कोटींवर १४ हजार कोटींचा फटका राज्यातल्या जनतेला बसणार आहे. सरकार मात्र यावर गप्पच आहे. विविध महामंडळे स्थापन झाल्यापासून २००४ पर्यंत अशा मान्यता देण्याचे अधिकार त्या-त्या महामंडळांना होते. २००४ नंतर हे अधिकार जलसंपदा विभागाचे सचिव आणि मंत्री यांना देण्यात आले. प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च झाल्यास व्यय अग्र समिती (एक्स्पेंडिचर प्रायोरिटी कमिटी) मान्यता देण्याचे काम करत असे. वित्तमंत्री, मुख्य सचिव, वित्त, नियोजन आणि जलसंपदाचे सचिव यांची ही समिती होती. श्वेतपत्रिकेच्या गदारोळानंतर या समितीने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यावा (पान ७ वर...)