शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:42 IST

सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.

सायखेड (जि.अकोला ) : सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतकºयाचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.हरिदास इंगळे यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना त्वरित अकोला येथे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून नंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सतत पाच दिवस मृत्यूशी झुंज देऊन पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाची साथ न मिळाल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.सरकारला चिठ्ठी :हरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे, असे नमूद केले आहे. ही चिठ्ठी त्यांच्या मृत्यूनंतर बुधवारी आढळून आली.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या