शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:42 IST

सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.

सायखेड (जि.अकोला ) : सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतकºयाचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.हरिदास इंगळे यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना त्वरित अकोला येथे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून नंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सतत पाच दिवस मृत्यूशी झुंज देऊन पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाची साथ न मिळाल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.सरकारला चिठ्ठी :हरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे, असे नमूद केले आहे. ही चिठ्ठी त्यांच्या मृत्यूनंतर बुधवारी आढळून आली.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या