शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:42 IST

सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.

सायखेड (जि.अकोला ) : सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतकºयाचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.हरिदास इंगळे यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना त्वरित अकोला येथे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून नंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सतत पाच दिवस मृत्यूशी झुंज देऊन पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाची साथ न मिळाल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.सरकारला चिठ्ठी :हरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे, असे नमूद केले आहे. ही चिठ्ठी त्यांच्या मृत्यूनंतर बुधवारी आढळून आली.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या