शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

सरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 18:23 IST

सौरभ मित्र मंडळाने पूरग्रस्तांसाठी बजावले कर्तव्य

मुंबई : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या संकटानंतर त्यांना आधार देण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला. गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा सारेच मदतीला धावले. पण प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपताना पूरग्रस्तांना मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून मदतीचा आधार दिला. एवढेच नव्हे तर मंडळाच्या आवाहनानंतर प्रभादेवीतील कामगार नगर नं. 2 मधील शाळकरी विद्यार्थ्यांनी पूरात वह्या-पुस्तके गमावलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या दप्तरातील कोऱ्या वह्या देऊन मदतीचा अनोखा आधार दिला. नगरातील शेकडो विद्यार्थ्यांनी वह्या आणि पेन दिल्यामुळे कोल्हापूरच्याइचलकरंजीतील ताकवडे भागातील शेतमजूरांच्या शेकडो मुलांना शालेय वस्तू देता आल्या. सौरभच्या या कर्तव्याचे इचलकरंजीच्या स्थानिक नागरिकांनी मनापासून आभार मानले.

पूरात अडकलेल्या कुटुंबांना मदतीचा आधार देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सौरभ मित्र मंडळाने यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करीत पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले. सौरभकडून आवाहन करताच नगरातील अनेक स्थानिकांनी मदतीचा हात दिला. काहींनी चादर, काहींनी ब्लँकेट दिल्या. महिलांसाठी उपयोगी गोष्टी गरज समजून काही महिलांनी अंर्तवस्त्र आणि पॅड दिले. स्वच्छतेसाठी लागणाऱया गोष्टी, खाद्यपदार्थ, तांदूळ, गव्हाचे पीठ, कडधान्य, साखरही मोठ्या संख्येने देण्यात आले. पूरामुळे शालेय विद्यार्थ्यांचेही फार मोठे नुकसान झाल्याची कल्पना असल्यामुळे नगरातील शाळकऱयांनीच पुढाकार घेऊन हजारो वह्या गोळा केल्या आणि प्रत्येकी सहा असे त्यांचे पॅकिंगही केले. विद्यार्थ्यांच्या आवाहनला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या दप्तरातीलच कोऱ्या वह्या दिल्या. काहींनी दुकानातून डझनभर वह्या आणून दिल्या तर काहींनी रोख पैसे दिले.

पूरग्रस्तांना मोठ्या संख्येने अवघ्या महाराष्ट्रातून मदत केली जातेय, मात्र ती तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचे प्रसारमाध्यमांकडून कळत असल्यामुळे मंडळाने कोल्हापूरच्या पाच गावांची पाहणी केल्यानंतर इचलकरंजीच्या ताकवडेजवळील शेतमजूरांची वस्ती असलेल्या पी.बी. मळा या पुरग्रस्त भागाची निवड केली. एवढेच नव्हे तर वितरणात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून त्या वस्तीतील सर्व कुटुंबप्रमुखांच्या नावांची नोंद करीत प्रत्येकाच्या घरात जाऊन वस्तूंचे वितरण केले. त्यामुळे वितरणाला पूरग्रस्तांकडून पूर्ण सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे या भागात कोणतीही सरकारी मदत पोहोचली नसताना मंडळाने घरोघरी जाऊन पूरग्रस्तांना मदतीचा आधार दिला.

टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर