शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

रक्ताचा थेंब न सांडता राम मंदिर मिळाले? अमित शहा गोध्रा कांड विसरलात का? राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 12:55 IST

छगन भुजबळांवर काय विश्वास ठेवता. ईडी आणि सीबीआयला घाबरून जाणारी, पळणारी लोक आहेत ही. डरपोक नंबर एक...

उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. जे आरे करत होते, आज शेवटी तुमचेच सरकार आहे आणि तुम्हीही त्याच जागेवर कारशेड उभी करत आहात. लोकांना त्रास झाला, किती खर्च झाला? पण विरोधासाठी विरोधात हे भाजपचे धोरण आहे.  फडणवीसांनी कायदेशीर अडचणी उभ्या केल्या. आरेची शेकडो झाडे तोडून पर्यावरणाचा नाश केला आणि शेवटी आलात कुठे? हे यांचे राजकारण आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. 

मणिपूरला काय चालले आहे? गृहमंत्री सांगत आहेत, रक्ताचा एक थेंब न सांडता आम्ही राम मंदिर बांधले. देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती आहे. मणिपूरमध्ये आज हे रक्तपात सुरू आहे, गृहमंत्री रोखू शकले नाहीत. आता प्रश्न राहिला राम मंदिराचा. तुम्ही म्हणता रक्ताचा एक थेंब न सांडता राम मंदिर मिळाले. तुम्ही नसाल तिकडे, सगळे तिकडे प्रमुख हिंदुत्ववादी लोक होते. गोधरा कांड काय होतं? ते देखील बलिदान होते ना. तेही तुम्ही विसरलात सत्तेवर आल्यावर.  जर तुम्हाला मंदिराचे श्रेय द्यायचे आहे, तर ते सर्वोच्च न्यायालयाला द्या, असे मत राऊत यांनी मांडले. 

छगन भुजबळांवर काय विश्वास ठेवता. ईडी आणि सीबीआयला घाबरून जाणारी, पळणारी लोक आहेत ही. डरपोक नंबर एक या चित्रपटातील हे सगळे विलन आहेत. भविष्यात यांच्यावर कोणीतरी चित्रपट काढला पाहिजे. यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी खंजीर खुपसला आहे, अशी टीका राऊत यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहChagan Bhujbalछगन भुजबळ