शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

धनगरांनी प्रत्येक कार्यक्रमात काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी; आरक्षणप्रश्नी गोपीचंद पडळकर आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:21 IST

...म्हणून पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे, असे सांगत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा टीका केली.

Gopichand Padalkar: महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशनंतर आता ही यात्रा कोकणात जाणार आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणाचा प्रश्नही आक्रमकपणाने मांडला जात आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत दौरे करत आहेत. यावेळी धनगरांनी प्रत्येक कार्यक्रमात काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी, असे आवाहन समाज बांधवांना केले आहे. 

राज्यातील धनगर समाजाला जागरूक करण्यासाठी या धनगर जागर यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. आमच्या जुन्या नेतेमंडळींनी यासाठी प्रयत्न केला आहे. दोन टप्प्यावर आमची लढाई सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी विचारमंचाच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली आहे. १७० पुरावे देण्यात आले आहेत. राज्य सरकारने तीन प्रतिज्ञापत्र धनगर समाजाच्या बाजूने दिलेली आहेत. डिसेंबर महिन्यात या याचिकेवर निकाल येणार आहे. हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातील धनगर समाजाला रस्त्यावरील लढाईला तयार करण्यासाठी जागर यात्रा

न्यायालयाचा निकाल धनगर समाजाच्या बाजूने येईल. मात्र, त्यात काही अडचण आली तर रस्त्यावरील लढाईसाठी धनगर समाजाने तयार राहावे, यासाठी ही जागर यात्रा काढली जात आहे. धनगर समाजाने एसटी आरक्षणासाठी मागणी केलेली नव्हती. तर एसटी अंमलबजावणीची होती. परंतु, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा आमच्या नेत्यांनी पहिल्यांदा धनगर समाजात चळवळ उभी केली आणि जाणीव करून दिली. धनगर समाज आता जागा होऊ लागला आहे, हे शरद पवार यांच्या लक्षात आले. एसटी आरक्षणाची मागणी केली जात आहे. ही मागणी मान्य झाली तर प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल. म्हणूनच संविधानात नसलेले आणि कोणत्याही राज्याने दिले नसलेले एनटीचे आरक्षण नव्याने काढले आणि ते धनगरांना दिले, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. 

...म्हणून पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे

ओबीसीच्या २७ टक्क्यांमधील ११ टक्के आरक्षण बाजूला केले आणि भटक्या जमातींना दिले. यामध्ये आमचे प्रचंड नुकसान आहे. आमचे मेरिट ओपनच्या मेरिटच्या बरोबर लागते. कधीकधी ते ओपनपेक्षा जास्त लागते. नाहीतर दोन मार्कांनी मागे असते. मग आमचा फायदा काय झाला. आम्हाला त्यातून काय मिळाले. आमच्या लोकसंख्येप्रमाणे काही मिळाले नाही. म्हणूनच पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे, असे पडळकर यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कुऱ्हाड हे आमचे प्रतिक आहे. आमच्या सगळ्यांच्या हातात कुऱ्हाड असते. कुऱ्हाडीशिवाय आमचे जीवन असू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाजाला आवाहन केले की, पुढच्या काळात धनगरांनी कार्यक्रमात घोंगडे आणि काठी, काठीऐवजी कुऱ्हाड द्यावी. हे अन्यायाविरोधातील प्रतिक आहे. अन्यायाविरोधात लढण्याची भूमिका पहिल्यापासून धनगरांची आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकर