शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

गोपीचंद पडळकर - प्रकाश आंबेडकर यांच्यात दोन तास खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 17:08 IST

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. यावेळी उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. 

ठळक मुद्देधनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली.येत्या 27 फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. 

- धनाजी कांबळे

मुंबई : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. यावेळी उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एक झंझावात सुरू केला असताना विविध पक्ष संघटनांतील कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधत असल्याचे चित्र आहे. धनगर आरक्षणावरून सध्या राजकारण तापत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाला न्याय मिळत नाही, अशी भावना धनगर समाजाची झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेषतः गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता आणि त्यांना धनगर समाजात असलेल्या पाठिंब्यामुळेच सांगली येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेतून गोपीचंद पडळकर यांना आघाडीत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र गोपीचंद पडळकर हे लोकसभेसाठी नाही, तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तलावाच्या ठिकाणी सत्याग्रही केला. त्या ऐतिहासिक ठिकाणावरून धनगर समाज पुन्हा एकदा सरकार दरबारी धडक मारणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. दरम्यान, राजकीयदृष्ट्या ही एक राजकीय घडामोड असून आगामी निवडणुकीत याचा निश्चितपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बंद खोलीत केलेली चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र