शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

गोपाला गोपाला; दूध का अमूलला?

By सुधीर लंके | Published: March 10, 2024 10:32 AM

‘आनंद’ प्रकल्पातून गुजरातने सहकारी दूध धंद्यात आपले पाय रोवले.

सुधीर लंके, निवासी संपादक, अहमदनगर

देशात जेवढ्या गायी आहेत. त्यातील ८.६५ टक्के गायी महाराष्ट्रात आहेत. म्हशींचे हे प्रमाण ६.५३ टक्के आहे. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांत महाराष्ट्रापेक्षाही दुभती जनावरे अधिक आहेत. पण, म्हणून महाराष्ट्राचे दूध धंद्यातील महत्त्व कमी होत नाही. ‘गोपाला, गोपाला’ म्हणत येथील गाडगेमहाराजांनी गुरे पाळणाऱ्या शेतकरी समाजाला साद घातली. पण महाराष्ट्र आज दुधात गुजरातच्या ‘अमूल अमूल’चा गजर करतो आहे. दुधातील ‘महानंद’ हा आपला सहकारी ब्रँड महाराष्ट्र जपू शकलेला नाही.

‘आनंद’ प्रकल्पातून गुजरातने सहकारी दूध धंद्यात आपले पाय रोवले. धवल क्रांतीतील ते एक रोल मॉडेल ठरले. वर्गीज कुरियन यांनी ती क्रांती साधली. दूध धंद्यातील ती पकड गुजरातने आजही सोडलेली नाही. त्यांचा ‘अमूल’ हा ब्रँड आता गुजरातच्या सीमा ओलांडून परराज्यातील सहकार क्षेत्राशी लढाई करतो आहे. कर्नाटक राज्यात गत विधानसभा निवडणुकीत कर्नाटकचा दुधाचा स्थानिक ब्रँड ‘नंदिनी’ आणि‘ ‘अमूल’ यांच्यात संघर्ष झाला. तत्कालीन भाजप सरकारने ‘अमूल’ला कर्नाटकात परवानगी देण्याचे धोरण घेतल्याने तेथे काँग्रेसने तो प्रचाराचा मुद्दा बनविला. ‘सेव्ह नंदिनी’ हा हॅश टॅग तेथील निवडणुकीत भाजप विरोधकांनी चालविला. २१ हजार कोटींच्या नंदिनी ब्रँडला अमूल गिळून टाकेल, ही भीती कर्नाटकला होती. ती भीती आज महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र ‘सेव्ह महानंद’ म्हणतो आहे.

‘महानंद’ हा मुंबईस्थित सहकारी दूध संघ तोट्यात असल्याने त्याचे विलीनीकरण गुजरात मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळात (एनडीडीबी) करण्याचे प्रस्तावित आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गुजरात ‘महानंद’ पळवत आहे, असा आरोप झाला आहे. 

शेतकरी नेत्यांचा आक्षेप काय आहे?

दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव सहकार आणि सरकार दोघेही देऊ शकलेले नाहीत. खासगीवाले शोषण करतातच, पण येथील सहकार क्षेत्रही अनैतिक बनले आहे. तेथे भ्रष्टाचार सुरू आहे. दुधाला किमान ३४ रुपये प्रती लिटर भाव द्या, दुधाला ‘एफआरपी’ (निश्चित आणि लाभदायक किंमत) द्या, यासाठी शेतकरी नेते लढा देत आहेत. दुधाच्या पावडरला आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव मिळत नाहीत. म्हणून भाव पडतात. तसेच दूध हा नाशवंत पदार्थ आहे. म्हणून भाव देणे परवडत नाही, असा सरकारचा व खासगी कंपन्यांचा दावा असतो. 

महाराष्ट्रात दुधाचा प्रक्रिया खर्च मोठा

महाराष्ट्रातील दुधाचा प्रक्रिया खर्च मोठा आहे. शेतकऱ्याला आज दुधाचा २६ ते २७ रुपये दर मिळतो. पण बाजारात हेच दूध पिशवीत आल्यानंतर त्याची किंमत ४४ ते ४५ रुपयांपर्यंत जाते. म्हणजे १७ ते १८ रुपये भाव मधील प्रक्रियेत वाढतो. गरजेपेक्षा दूध अतिरिक्त झाल्याने दुधाचे भाव पडतात, असेही सांगितले जाते. पण, दरडोई दूध उत्पादनात महाराष्ट्र सरासरीच्या मागे आहे. गोकुळसारखे सहकारी दूध संघ ३३ रुपयांपर्यंत दर देतात.

लोक दुधापासून का दूर जात आहेत

२०२२-२३ साली देशाची दुधाची दरडोई उपलब्धता सरासरी ४५९ ग्रॅम प्रतिदिन आहे. महाराष्ट्राचा हा आकडा ३२९ आहे. गुजरात (६७०), मध्य प्रदेश (६४४), उत्तर प्रदेश (४२६) या सरासरीत पुढे आहे. दुधाची भेसळ ही देखील महाराष्ट्रातील मोठी समस्या आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभाग शुद्ध दुधाची हमी महाराष्ट्राला देऊ शकलेला नाही. परिणामी अनेक लोकांनी दूध पिणे व दुधाचे पदार्थ खाणे सोडले आहे. लोक दुधापासून दूर जात आहेत. ही समस्याही दूध धंदा अडचणीत टाकत आहे. 

एकदा दुधावर प्रक्रिया करून त्याची पावडर किंवा अन्य पदार्थ बनले की दुधाचे आयुष्य वाढते. दूध नाशवंत राहत नाही. मग भाव द्यायला काय हरकत आहे? दुधाला सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केले. पण ‘ई गोपाला’त आता जनावरांची ऑनलाइन नोंदणी सक्तीची आहे. खाटी जनावरे जेव्हा दुभती होतात तेव्हा हा बदलही ऑनलाइन अपडेट करावा लागतो. शेतकरी तेवढा सक्षम, ई-साक्षर नाही. पर्यायाने असे शेतकरी अनुदानाला मुकतात. - अजित नवले, किसान सभेचे नेते

महानंदला ऊर्जितावस्था आणण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. हे तात्पुरते धोरण आहे. महानंदची स्थिती सुधारल्यावर हा ब्रँड पुन्हा आपलाच असेल.’ सहकारी दूध धंदे तोट्यात का जात आहेत? याबाबत परजणे यांचे विश्लेषण हे आहे की ‘दूध धंद्यातील स्पर्धा ही अनैतिक पातळीवर गेली आहे. खासगी दूध धंद्याच्या तुलनेत सहकार क्षेत्राला बंधने अधिक आहेत. खासगी क्षेत्रावर तेवढी बंधने नाहीत. त्यामुळे कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील सरकार दूध धंद्याचे निकष बदलवत आहे. यातून भविष्यात परिस्थिती सुधारेल. - राजेश परजणे, मावळते अध्यक्ष, महानंद 

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी