शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

आनंदाची बातमी; उजनी धरण शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:02 IST

भीमेत विसर्ग कमी;  पुण्यात पडलेल्या पावसामुळे उजनी भरले

ठळक मुद्देसध्या माळशिरस तालुक्यातील अकलुज व भीमेकाठच्या पंढरपुरात पूरपस्थिती माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारापंढरपूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या बाधीत होणाºया कुटुंबांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती असताना पुण्यात पडलेल्या पावसामुळे उजनी धरण बुधवारी शंभर टक्के भरले आहे. सध्या उजनी धरणातून भीमेत दीड लाख क्सुसेक पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली उजनी धरणाची बुधवारी सकाळी अकरा वाजताची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. उजनी पाणी भरले: ११६.९९ टीएमसी, टक्केवारी: ९९.५६ टक्के, भीमेत विर्सग: १ लाख ५0 हजार क्सुसेक, वीजनिर्मिती: १६00, अशा प्रकारे नदीत विसर्ग १ लाख ५१ हजार ६00 क्सुसेक. मुख्य कालवा: २५00, बोगदा: १२00, दौंड विर्सग: १ लाख १५ हजार ९१९ क्सुसेक. नीरा प्रणाली धरण विर्सग: भाटगर: १३ हजार ९८0, निरादेवघर: १९ हजार ६५0, गुंजवाणी: ३ सहिर ५४, एकूण वीरधरण विर्सग: ७८ हजार ३२५ क्सुसेक. उजनी व वीरधरणातील विसर्ग कमी झाला आहे.

सध्या माळशिरस तालुक्यातील अकलुज व भीमेकाठच्या पंढरपुरात पूरपस्थिती आहे. भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत. माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या बाधीत होणाºया कुटुंबांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

उजनी धरणात बंडगार्डनकडून येणारा विर्सग लाखाच्या पुढे आहे. बुधवारी सकाळी पुन्हा पुण्यात पावसाने जोर धरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बंडगार्डनकडून येणारा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकPandharpurपंढरपूर