शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

पर्यटनाला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Published: September 28, 2016 2:34 AM

महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर पर्यटन व्यवसायातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्राचे रूपडे पालटून महाराष्ट्राच्या पर्यटनालाही ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत आहेत.पर्यटन व्यवसायाची नवी मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता बाह्या सरसावून पुढे आले आहे. जागतिक नकाशावरचा पर्यटन बिंदू म्हणून महाराष्ट्र लख्खपणे चमकवण्यासाठी, महामंडळाने ३ हजार कोटींचा पर्यटन विकासाचा आराखडा करण्याचे निश्चित केले आहे. २०१५ साली भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी ४४ लाख ८ हजार ९१६ पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याची नोंद आहे, तर आनंदाची बाब म्हणजे, पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र द्वितीय स्थानी आहे.शासनाच्या नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायामध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन उद्योग संघाचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)...तर मोदीच ‘अतुल्य’ भारतचा चेहरा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांमुळे पर्यटन क्षेत्रातील व्यवसायात वृद्धी झाली आहे. परदेशातील विविध देश-शहरांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणांमुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याने, भारताच्या पर्यटनाला चालना मिळाली. केंद्र सरकारचे पर्यटन खाते पंतप्रधान मोदी यांनाच पर्यटन क्षेत्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करण्याची शक्यता आहे.देश असो वा राज्य आपल्याकडे पर्यटन विकास समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारची संपत्ती आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन कृतिशील योजना राबविल्या पाहिजेत, तसेच पर्यटन विभागाशी निगडित इतर विभागांनी या खात्याशी समन्वय राखला पाहिजे. शिवाय, नवे तंत्रज्ञान, सोशल मीडिया अशा नव्या माध्यमांचा विकास करून पर्यटनाला हायटेक बनविले पाहिजे.- उमाकांत तासगावकर, पर्यटनतज्ज्ञ