देवाचा डोंगर शासन दरबारी उपेक्षितच--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग ३

By Admin | Updated: January 29, 2015 23:42 IST2015-01-29T21:45:46+5:302015-01-29T23:42:51+5:30

पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम : दुर्दैवाचे दशावतार पाचवीला पुजलेले--लोकमतचे मानले आभार

God's Mountain Government is Neglected - The Problems of God's Hill - Part 3 | देवाचा डोंगर शासन दरबारी उपेक्षितच--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग ३

देवाचा डोंगर शासन दरबारी उपेक्षितच--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग ३

शिवाजी गोरे - दापोली -- देवाच्या डोंगरावर सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने निसर्गाचे पाणी क्षणार्धात समुद्राकडे वाहून जाते व हिवाळा संपला की देवाच्या डोंगरावरील भटक्या धनगर समाजाची पाण्यासाठी भटकंती सुरु होते. ‘तीच माणसे, त्याच समस्या, दरवर्षी पाण्यासाठी मरणयातना’, असे दुर्दैवी जगणे त्यांच्या नशिबी आले आहे. दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या देवाचा डोंगरावरील पाणी समस्या सोडवण्यासाठी चार वाड्यांचे मनोमीलन झाले. नळपाणी योजना राबवण्याचा ठराव झाला. मात्र, चार वर्ष होऊन गेली, तरीही नळपाणी योजनेचे घोडे कागदावर अडले आहे.
देवाच्या डोंगरावरील पाणी समस्या ल्ह्यिातील सर्वात मोठी ीभषण पाणी समस्या असूनसुद्धा त्याकडे गांभीर्याने घेतले जात नाही. देवाच्या डोंगराकडे वारंवार शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने सरकार आपल्यावर अन्यायचच करतेय अशी भावना देवाच्या डोंगरवासीयांची झाली आहे.
देवाच्या डोंगरावरील भटका धनगर समाज शिवाजी महाराजांच्या काळात उदरनिर्वाहासाठी भटकंती करत कोकणात आला. कोकणात भटकंती करताना एखाद्या सुरक्षित ठिकाणी वस्ती करुन राहू लागला. देवाच्या डोंगरावरील हा समाजसुद्धा भटकंती करत गाई मेंढ्या घेऊन देवाच्या डोंगरावर विसावला. आज या समाजाच्या कित्येक पिढ्या कोकणात होऊन गेल्या, तरीदेखील आजही त्यांच्या नशिबी उपेक्षित जगणे आले आहे. डोंगरावर स्वयंभू शंकराचे मंदिर आहे. या डोंगरावरुन देवाचा डोंगर हे नाव प्रचलित झाले. देवाच्या डोंगरावर राहणाऱ्या धनगर समाजाची ही अकरावी पिढी आहे.
शासन दरबारी देवाच्या डोंगराची ओळख झाल्यावर अलीकडे काही सुधारणा झाल्या आहेत. देवाच्या डोंगरावरील चार वाड्यांकरिता खेड पंचायत समिती अंतर्गत जिल्हापरिषद मराठी शाळा सुरु करण्यात आली आहे. तुळशीवाडी, खेड तालुका, देवाचा डोंगर ही शाळा आता आठवीपर्यंत झाली आहे. परंतु, आठवीनंतर पायपीट करुन जामगेला जावे लागते. दररोज १४ किलोमीटरची पायपीट नशिबी येते. त्यामुळे काही मुलगे-मुली देवाच्या डोंगरावरील शिक्षण संपले की शाळा सोडतात. संपूर्ण साक्षरता मोहीम सरकारने राबवली; मात्र अजूनही देवाच्या डोंगरावरील भटका समाज आजही निरक्षर आहे. त्यामुळे, साक्षरता मोहीम किती फसवी आहे, हेच यावरून लक्षात येते. देवाच्या डोंगरावर एखादा माणूस आजारी पडला किंवा आजाराची साथ पसरली तर दवाखाना नाही, डॉक्टर नाहीत, देवाच्या डोंगरावर आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकत सुद्धा नाहीत. त्यामुळे, आजारी पडलेल्या माणसाला दापोली, खेड किंवा महाडशिवाय पर्याय नाही. रात्री-अपरात्री कोणती दुर्घटना घडल्यास कोणतेही वाहन नाही. देवाच्या डोंगरावर लाईट आहे. परंतु, होल्टेज नसते. वीजेचे दिवे होल्टेजअभावी लुकलुकत मंद प्रकाश देतात. बऱ्याचदा, आठ आठ दिवस वीज नसते. महावितरणचे कर्मचारी इकडे फिरकतसुद्धा नाहीत. देवाच्या डोंगरावरील दुरावस्थेमुळे येथे येण्यासाठी पर्यटकांना फारच हाल सहन करावे लागत आहेत.

लोकमतचे मानले आभार
‘लोकमत’च्या रेट्यामुुळे शासनाला जाग येत आहे. गेली अनेक वर्षे पाणीटंचाईवर वृत्तांकन करुन ‘लोकमत’ने देवाच्या डोेंगरवासीयांना सहकार्य केले. या वृत्ताची दखल घेऊन अनेक लोक देवाच्या डोंगरावर येऊन गेले. नळपाणी योजनेचे आश्वासन देण्यात आले. गेली ८ वर्ष आमच्या व्यथा लोकमतमधून मांडत जात आहेत, असे सांगून त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.


रोटी बेटी व्यवहार रखडले
देवाच्या डोंगरावरील धनगर समाजाचे कुलदैवत सातारा जिल्ह्यात आहे. जत्रेला जाण्याची प्रथा कायम आहे. जुन्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न करण्याची प्रथा धनगर समाजाची आहे. पाणीटंचाईमुळे धनगर समाज रोटी बेटी व्यवहार करण्यास नाखुश असल्याने सातारा-सोलापूर-सांगली-नगर जिल्ह्यात त्यांना रोटी बेटी व्यवहार करावा लागतो.

योजनेचे घोडे अडलेले
देवाच्या डोंगरावरील चारही वाड्यांसाठी भोळवली धरणातून पाणी योजना राबवण्याचा निर्णय झाला. दापोली-मंडणगड पंचायत समिती ४ वर्षांपूर्वी संयुक्त पाहणी केली होती. भोळवली धरणातून पाणी उचलून नळपाणी योजना राबवण्याचे ठरले. चार वर्ष होऊन गेली, तरीही नळपाणी योजनेचे घोडे अजून कागदावरच असल्याचे दिसून येते.

पायाभूत सुविधांचा अभाव
देवाच्या डोंगरावर मावी वस्ती आहे. मात्र, या वस्तीत सरकारकडून पायाभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. येथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो. पाणी, रस्ते, शिक्षण, शौचालय यांचा अभाव आहे. देवाचा डोंगर येथे राजकीय पुढाऱ्यांचा रहिवास केवळ निवडणुकीपुरताच असतो.


नळपाणी योजनेचे घोड अडले कागदावरच.
डोक्यावरचा हंडा कधी उतरणार ? देवाचा डोंगरवासीयांचा सवाल.
शिवरायांच्या काळात भटका धनगर समाज सातारा जिल्ह्यातून भटकंती करत करत येऊन विसावला देवाच्या डोंगरावर.
१९७२ नंतर देवाच्या डोंगरावरील झरे अचानक आटले;
तेव्हापासून सुरु झाला वनवास.
पूर्वीच्याकाळी देवाच्या डोंगरावरून आजारी माणसाला डोलीत बसवून न्यावे लागत होते दवाखान्यात.
पाऊलवाट अन हलाखीची परिस्थिती; त्यामुळे आजारी माणसला डोली हाच पर्याय.
देवाच्या डोंगरावरील सर्वाधिक वाद केवळ पाण्यामुळेच.
महसुली सीमावादात अडकलाय देवाचा डोंगर.
डोंगर देवाचा; वाद सीमेचा.
देवाच्या डोंगराला एसटीची प्रतिक्षा.
देवाच्या डोंगराला पर्यटनाचा क दर्जा, मात्र पर्यटन सुविधांची वानवा.
देवाच्या डोंगरावरून दिसते विलोभनीय दृश्य, मात्र सुविधांच्या अभावामुळे देवाचा डोंगर दुर्लक्षितच.

देवाच्या डोंगरावरील भटक्या समाजाला नवीन सरकारकडून फार अपेक्षा आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी ‘अच्छे दिन’ आयेंगे सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘अच्छे दिन’ कधी येतात, त्याची प्रतिक्षा आहे. आमच्यासाठी लवकर ‘अच्छे दिन’ यावेत व पाणी समस्या कायमची संपावी.
- पांडुरंग आखाडे, ग्रामस्थ
देवाच्या डोंगरावर नळपाणी योजना होईल, असे सांगण्यात आले होते. गेले २० ते २५ वर्षे नळपाणी योजनेत आश्वासने दिली जातात. नळपाणी योजना कधी होणार. आमच्या डोक्यावरचा हंडा उतरणार कधी ? निदान आमच्या नशिबात जे आहे ते मुलांच्या नशिबी येऊ नये.
- मंदा आखाडे, ग्रामस्थ
 

Web Title: God's Mountain Government is Neglected - The Problems of God's Hill - Part 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.