शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया'मध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू; भाजपा नेते नितीन गडकरींना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 17:36 IST

नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल असं राऊतांनी म्हटलं.

हिंगोली – भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व आता नितीन गडकरींना संपवण्यासाठी निघाले आहेत. अख्ख्या देशात भ्रष्टाचाराची राजवट सुरू आहे. कोविड काळात पीएम केअर फंडातून किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला ते विचारायचं नाही. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यायचा नाही. अनेक खात्यातील भ्रष्टाचार उघड झाला नाही. परंतु देशातील ५ नवीन प्रकल्पाबाबत केंद्राच्या कॅगने अहवाल दिला. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातील २ भ्रष्टाचार उघड केले. पर्यायाने नितीन गडकरींकडे असणाऱ्या खात्यातील भ्रष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो उघड केला.  मराठी माणसाच्या द्वेषातून हे केले असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी  केला.

विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेतृत्व असलेले नितीन गडकरी लोकप्रिय होतायेत. उद्या पंतप्रधानपदाचे ते दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट नेत्यांनी नितीन गडकरींना संपवण्यासाठी असलेला हा कट आहे. पण हा कट उधळून लावण्याचे काम महाराष्ट्र करेल. नितीन गडकरींना आमची विनंती आहे, तुम्ही मराठी माणसाचे पाणी दाखवा. कशाला घाबरता त्यांना? तुम्ही आवाज द्या, इंडियामध्ये या, तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा शब्द उद्धव ठाकरेसुद्धा देतील अशा शब्दात त्यांनी गडकरींना खुली ऑफर दिली.

तसेच नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल. अजितदादा चायनीज, गद्दार चायनीज, ४ दिवस चमकतील नंतर लाईट बंद होईल. वापरा आणि फेकून द्या असं धोरण असलेल्या भाजपाने ज्यारितीने उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली त्यापेक्षाही जास्त बेईमानी सध्याचे मुख्यमंत्री आणि ४० गद्दार यांच्याशीही करणार, येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांना घरी जाऊन बसावे लागणार आहे. तिकीटे देणार नाहीत असा आरोपही खासदार विनायक राऊत यांनी केला.

दरम्यान, भाजपाला गल्लीगल्लीत जाऊन मतांची भीक मागावी लागते हे भाजपाचे, मोदींचे दुर्दैव आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम करतेय. ५ टक्के कांदा उत्पादकांना अनुदान मिळाले बाकीच्यांच्या तोंडाना पानं पुसली, शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने केले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणे थांबले नाही. त्यामुळे लोकांना दिलासा देणारं शासन हवं ते राज्यात नाही असंही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा