शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

'इंडिया'मध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू; भाजपा नेते नितीन गडकरींना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 17:36 IST

नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल असं राऊतांनी म्हटलं.

हिंगोली – भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व आता नितीन गडकरींना संपवण्यासाठी निघाले आहेत. अख्ख्या देशात भ्रष्टाचाराची राजवट सुरू आहे. कोविड काळात पीएम केअर फंडातून किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला ते विचारायचं नाही. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यायचा नाही. अनेक खात्यातील भ्रष्टाचार उघड झाला नाही. परंतु देशातील ५ नवीन प्रकल्पाबाबत केंद्राच्या कॅगने अहवाल दिला. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातील २ भ्रष्टाचार उघड केले. पर्यायाने नितीन गडकरींकडे असणाऱ्या खात्यातील भ्रष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो उघड केला.  मराठी माणसाच्या द्वेषातून हे केले असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी  केला.

विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेतृत्व असलेले नितीन गडकरी लोकप्रिय होतायेत. उद्या पंतप्रधानपदाचे ते दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट नेत्यांनी नितीन गडकरींना संपवण्यासाठी असलेला हा कट आहे. पण हा कट उधळून लावण्याचे काम महाराष्ट्र करेल. नितीन गडकरींना आमची विनंती आहे, तुम्ही मराठी माणसाचे पाणी दाखवा. कशाला घाबरता त्यांना? तुम्ही आवाज द्या, इंडियामध्ये या, तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा शब्द उद्धव ठाकरेसुद्धा देतील अशा शब्दात त्यांनी गडकरींना खुली ऑफर दिली.

तसेच नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल. अजितदादा चायनीज, गद्दार चायनीज, ४ दिवस चमकतील नंतर लाईट बंद होईल. वापरा आणि फेकून द्या असं धोरण असलेल्या भाजपाने ज्यारितीने उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली त्यापेक्षाही जास्त बेईमानी सध्याचे मुख्यमंत्री आणि ४० गद्दार यांच्याशीही करणार, येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांना घरी जाऊन बसावे लागणार आहे. तिकीटे देणार नाहीत असा आरोपही खासदार विनायक राऊत यांनी केला.

दरम्यान, भाजपाला गल्लीगल्लीत जाऊन मतांची भीक मागावी लागते हे भाजपाचे, मोदींचे दुर्दैव आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम करतेय. ५ टक्के कांदा उत्पादकांना अनुदान मिळाले बाकीच्यांच्या तोंडाना पानं पुसली, शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने केले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणे थांबले नाही. त्यामुळे लोकांना दिलासा देणारं शासन हवं ते राज्यात नाही असंही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा