शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आमचे मनोबल कायम राहण्यासाठी लोकसभेची एक तरी जागा द्या : आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 10:57 IST

सध्या तरी आपण एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, असे आठवले यांनी म्हटले आहे.

मुंबई - प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आपल्याला आव्हान नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. वचिंत बहुजन आघाडीला जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला आनंदच होत आहे. परंतु त्यांच्या आघाडीचा फायदा शिवसेना-भाजपलाच होणार असा दावा केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एमआयएमच्या साथीत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. तसेच अनेक ठिकाणचे उमेदवार देखील जाहीर केले. याविषयी आठवले यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी वंचित आघाडीचे आपल्याला आव्हान नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी आठवले म्हणाले की, भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात एक तरी जागा सोडणे अपेक्षित होते. मी मुंबई उत्तर-पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून इच्छूक होतो. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी बोललो होतो. पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या तरी आपण एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, असही आठवले यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना