शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी शेतक-यांना १० वर्षांची मुदत द्या - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:48 IST

राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम

सोलापूर : राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम भरण्यासाठी १० वर्षांची मुदत द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख होते.प्रारंभी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफी करताना शरद पवार यांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेतला होता असे सांगून आजही पवार यांनी कर्जमाफीबाबत सूचना केल्या तर त्याचा विचार करु, असे सांगितले.पवार म्हणाले, ‘शासनाने शेतक-यांचे कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली आहे. ही माफी अल्पभूधारक आणि पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना लाभदायक असली तरी फळबागा अथवा इतर पिकांसाठी कर्ज घेतलेल्या मोठ्या शेतक-यांना याचा लाभ होत नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या कर्जदारांना याचा लाभ घ्यायचा असेल तर उर्वरित रक्कम अगोदर बँकेत भरावी लागणार आहे. इतकी रक्कम जर शेतक-यांकडे असली असती तर ते कर्जदार कशासाठी झाले असते?मोठ्या थकबाकीदार शेतक-यांना कोणी विचारत नाही. वीज, पाणी, खते वेळेवर द्या व उत्पादित धान्याला भाव द्या, शेतकरी कधीच थकबाकीदार होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र