शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी शेतक-यांना १० वर्षांची मुदत द्या - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:48 IST

राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम

सोलापूर : राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम भरण्यासाठी १० वर्षांची मुदत द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख होते.प्रारंभी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफी करताना शरद पवार यांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेतला होता असे सांगून आजही पवार यांनी कर्जमाफीबाबत सूचना केल्या तर त्याचा विचार करु, असे सांगितले.पवार म्हणाले, ‘शासनाने शेतक-यांचे कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली आहे. ही माफी अल्पभूधारक आणि पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना लाभदायक असली तरी फळबागा अथवा इतर पिकांसाठी कर्ज घेतलेल्या मोठ्या शेतक-यांना याचा लाभ होत नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या कर्जदारांना याचा लाभ घ्यायचा असेल तर उर्वरित रक्कम अगोदर बँकेत भरावी लागणार आहे. इतकी रक्कम जर शेतक-यांकडे असली असती तर ते कर्जदार कशासाठी झाले असते?मोठ्या थकबाकीदार शेतक-यांना कोणी विचारत नाही. वीज, पाणी, खते वेळेवर द्या व उत्पादित धान्याला भाव द्या, शेतकरी कधीच थकबाकीदार होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र