शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"मराठ्यांची पोरं मोठं होऊ द्यायची नाही हे षडयंत्र सर्वसामान्यांनी हाणून पाडलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 14:56 IST

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

जालना – सर्व मराठा समाज एकवटलेला आहे. स्वत:च्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. गेल्या ७० वर्षात मराठ्यांची पोरं काही झाले तरी मोठं होऊ द्यायचे नाही असं षडयंत्र रचलं होते. परंतु सामान्य मराठ्यांनी एकजूट केली आणि सर्व षडयंत्र हाणून पाडले. आज मराठ्यांच्या मुलांना त्यांचे उद्ध्वस्त केलेले आयुष्य पुन्हा प्राप्त होऊ लागलंय. मग तो श्रीमंत, गरीब, शेतकरी सर्व मराठा समाजाचे कल्याण व्हायला लागले आहे. त्यामुळे आता आम्ही मागे हटत नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ डिसेंबरपर्यंत आम्ही सरसकट आरक्षण मिळवणार. सरकारने कुणी कितीही उभे केले तरी समाजात फूट पडणार नाही. अखंड मराठा एकवटलेला आहे. समाजाची भूमिका प्रत्येक घरातील माणसाच्या हिताची भूमिका आहे. जो कुणी वेगळी भूमिका घेत असेल ती राजकीय आणि स्वत:च्या स्वार्थासाठी घेतोय. मी मराठा समाजाची सेवा करतोय. सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी प्रामाणिकपणे सेवा करत राहणार. समाजातील शेवटच्या घटकांना आरक्षण मिळाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही आणि मीदेखील थांबणार नाही हा माझा शब्द आहे. मी सेवक म्हणून समाजाची सेवा करेन असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेल हीच आमची भावना आहे त्याशिवाय माघार नाही. खूप मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळायला लागलेत. अनेक ठिकाणी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे. आमचा फोकस मराठा आरक्षणावर आहे. कुणी कितीही टीका केली तरी आम्ही लक्ष देणार नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होणार नाही. कुणालाही तेढ निर्माण करणे शक्य होणार नाही. मराठा समाज आरक्षण मिळवणारच आहे. कुणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर आम्ही काढणार आहोत. आमच्या हक्काचे आरक्षण द्या, २४ डिसेंबरनंतर आम्ही सगळ्यांची नावे सांगणार आहोत असंही जरांगे पाटील यांनी सूचक विधान केले.

दरम्यान, सर्व मराठे सज्ज आहेत, उद्यापासून दौरा सुरू होणार आहे. प्रत्येक गावात उत्साह आहे. मराठा समाजाला इतकी वर्ष लढाई करून काही हाती लागले नव्हते, मात्र आता अनेक जिल्ह्यात नोंदी मिळत आहे. आता कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना आयुष्याची भाकरी मिळाली असं वाटायला लागली आहे. मराठ्यात प्रचंड उत्साह आहे. जिथे जिथे गाठीभेटी होतायेत तिथे तुफान गर्दी होतेय. समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू येत आहे. ३५ ते ४० टक्के समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती