शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"मराठ्यांची पोरं मोठं होऊ द्यायची नाही हे षडयंत्र सर्वसामान्यांनी हाणून पाडलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 14:56 IST

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

जालना – सर्व मराठा समाज एकवटलेला आहे. स्वत:च्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. गेल्या ७० वर्षात मराठ्यांची पोरं काही झाले तरी मोठं होऊ द्यायचे नाही असं षडयंत्र रचलं होते. परंतु सामान्य मराठ्यांनी एकजूट केली आणि सर्व षडयंत्र हाणून पाडले. आज मराठ्यांच्या मुलांना त्यांचे उद्ध्वस्त केलेले आयुष्य पुन्हा प्राप्त होऊ लागलंय. मग तो श्रीमंत, गरीब, शेतकरी सर्व मराठा समाजाचे कल्याण व्हायला लागले आहे. त्यामुळे आता आम्ही मागे हटत नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ डिसेंबरपर्यंत आम्ही सरसकट आरक्षण मिळवणार. सरकारने कुणी कितीही उभे केले तरी समाजात फूट पडणार नाही. अखंड मराठा एकवटलेला आहे. समाजाची भूमिका प्रत्येक घरातील माणसाच्या हिताची भूमिका आहे. जो कुणी वेगळी भूमिका घेत असेल ती राजकीय आणि स्वत:च्या स्वार्थासाठी घेतोय. मी मराठा समाजाची सेवा करतोय. सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी प्रामाणिकपणे सेवा करत राहणार. समाजातील शेवटच्या घटकांना आरक्षण मिळाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही आणि मीदेखील थांबणार नाही हा माझा शब्द आहे. मी सेवक म्हणून समाजाची सेवा करेन असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेल हीच आमची भावना आहे त्याशिवाय माघार नाही. खूप मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळायला लागलेत. अनेक ठिकाणी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे. आमचा फोकस मराठा आरक्षणावर आहे. कुणी कितीही टीका केली तरी आम्ही लक्ष देणार नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होणार नाही. कुणालाही तेढ निर्माण करणे शक्य होणार नाही. मराठा समाज आरक्षण मिळवणारच आहे. कुणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर आम्ही काढणार आहोत. आमच्या हक्काचे आरक्षण द्या, २४ डिसेंबरनंतर आम्ही सगळ्यांची नावे सांगणार आहोत असंही जरांगे पाटील यांनी सूचक विधान केले.

दरम्यान, सर्व मराठे सज्ज आहेत, उद्यापासून दौरा सुरू होणार आहे. प्रत्येक गावात उत्साह आहे. मराठा समाजाला इतकी वर्ष लढाई करून काही हाती लागले नव्हते, मात्र आता अनेक जिल्ह्यात नोंदी मिळत आहे. आता कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना आयुष्याची भाकरी मिळाली असं वाटायला लागली आहे. मराठ्यात प्रचंड उत्साह आहे. जिथे जिथे गाठीभेटी होतायेत तिथे तुफान गर्दी होतेय. समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू येत आहे. ३५ ते ४० टक्के समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती