शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 12:59 IST

पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़

ठळक मुद्देआता शेतकरी विरुद्ध सरकार लढाई सुरू २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत ते बोलत होते़ व्यासपीठावर सुकाणू समितीचे सदस्य बाबा आढाव, संजय पाटील-घाटणेकर, पंजाबराव पाटील, बी़ जी़ पाटील, डॉ़ अजित नवले, किशोर ढमाले, करण गायकर, गणेश जगताप, गणेश कदम, सुशीला मोराळे, माऊली पवार, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, माऊली हळणवर आदी उपस्थित होते़शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे असे सांगून रघुनाथ पाटील म्हणाले, आता शेतकरी विरुद्ध सरकार अशी लढाई सुरू झाली आहे़ सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे़ आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे़ पण पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता आहे़ कारण सध्या सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी कर्जदार शेतकºयांची खरी आकडेवारी समोर येईल़ त्यानंतर संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल़ २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़ कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय षडयंत्र आहे़ आता खरीप हंगाम गेला़ दिवाळीनंतर रब्बी हंगाम येईल तरीही शेतकºयांना कर्ज मिळणार नाही़ केवळ शेतकºयांना अडचणीत ठेवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य संजय पाटील- घाटणेकर, डॉ़ अजित नवले, माऊली पवार, सुशीला मोराळे यांनी भाषणातून शेतकºयांच्या समस्या मांडत सरकारवर जोरदार टीका केली़ शिवाय २६ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होत असलेल्या शेतकरी परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़------------------------भाजपाचा सरपंच नकोलोकसभा, विधानसभेत आघाडी सरकार नको म्हणून युतीला निवडून दिले़ त्यांनीही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही़ शेतकºयांची तर निव्वळ फसवणूक केली़ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मिळालेल्या यशाने भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे; मात्र आता त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा एकही सरपंच होणार नाही याची काळजी शेतकºयांनी घेतली पाहिजे़ या निवडणुकीत भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले़