शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 12:59 IST

पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़

ठळक मुद्देआता शेतकरी विरुद्ध सरकार लढाई सुरू २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत ते बोलत होते़ व्यासपीठावर सुकाणू समितीचे सदस्य बाबा आढाव, संजय पाटील-घाटणेकर, पंजाबराव पाटील, बी़ जी़ पाटील, डॉ़ अजित नवले, किशोर ढमाले, करण गायकर, गणेश जगताप, गणेश कदम, सुशीला मोराळे, माऊली पवार, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, माऊली हळणवर आदी उपस्थित होते़शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे असे सांगून रघुनाथ पाटील म्हणाले, आता शेतकरी विरुद्ध सरकार अशी लढाई सुरू झाली आहे़ सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे़ आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे़ पण पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता आहे़ कारण सध्या सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी कर्जदार शेतकºयांची खरी आकडेवारी समोर येईल़ त्यानंतर संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल़ २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़ कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय षडयंत्र आहे़ आता खरीप हंगाम गेला़ दिवाळीनंतर रब्बी हंगाम येईल तरीही शेतकºयांना कर्ज मिळणार नाही़ केवळ शेतकºयांना अडचणीत ठेवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य संजय पाटील- घाटणेकर, डॉ़ अजित नवले, माऊली पवार, सुशीला मोराळे यांनी भाषणातून शेतकºयांच्या समस्या मांडत सरकारवर जोरदार टीका केली़ शिवाय २६ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होत असलेल्या शेतकरी परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़------------------------भाजपाचा सरपंच नकोलोकसभा, विधानसभेत आघाडी सरकार नको म्हणून युतीला निवडून दिले़ त्यांनीही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही़ शेतकºयांची तर निव्वळ फसवणूक केली़ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मिळालेल्या यशाने भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे; मात्र आता त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा एकही सरपंच होणार नाही याची काळजी शेतकºयांनी घेतली पाहिजे़ या निवडणुकीत भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले़