शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 12:59 IST

पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़

ठळक मुद्देआता शेतकरी विरुद्ध सरकार लढाई सुरू २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत ते बोलत होते़ व्यासपीठावर सुकाणू समितीचे सदस्य बाबा आढाव, संजय पाटील-घाटणेकर, पंजाबराव पाटील, बी़ जी़ पाटील, डॉ़ अजित नवले, किशोर ढमाले, करण गायकर, गणेश जगताप, गणेश कदम, सुशीला मोराळे, माऊली पवार, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, माऊली हळणवर आदी उपस्थित होते़शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे असे सांगून रघुनाथ पाटील म्हणाले, आता शेतकरी विरुद्ध सरकार अशी लढाई सुरू झाली आहे़ सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे़ आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे़ पण पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता आहे़ कारण सध्या सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी कर्जदार शेतकºयांची खरी आकडेवारी समोर येईल़ त्यानंतर संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल़ २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़ कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय षडयंत्र आहे़ आता खरीप हंगाम गेला़ दिवाळीनंतर रब्बी हंगाम येईल तरीही शेतकºयांना कर्ज मिळणार नाही़ केवळ शेतकºयांना अडचणीत ठेवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य संजय पाटील- घाटणेकर, डॉ़ अजित नवले, माऊली पवार, सुशीला मोराळे यांनी भाषणातून शेतकºयांच्या समस्या मांडत सरकारवर जोरदार टीका केली़ शिवाय २६ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होत असलेल्या शेतकरी परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़------------------------भाजपाचा सरपंच नकोलोकसभा, विधानसभेत आघाडी सरकार नको म्हणून युतीला निवडून दिले़ त्यांनीही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही़ शेतकºयांची तर निव्वळ फसवणूक केली़ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मिळालेल्या यशाने भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे; मात्र आता त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा एकही सरपंच होणार नाही याची काळजी शेतकºयांनी घेतली पाहिजे़ या निवडणुकीत भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले़