शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंचनासाठी २५ हजार कोटी द्या’

By admin | Updated: March 10, 2016 03:55 IST

राज्यातील १४ दुष्काळी जिल्हे आणि १७९ अवर्षणप्रवण तालुक्यांमधील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

मुंबई : राज्यातील १४ दुष्काळी जिल्हे आणि १७९ अवर्षणप्रवण तालुक्यांमधील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास ७० हजार कोटी रुपयांची गरज भासणार असून दुष्काळी आणि अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी रुपये राज्याला द्यावेत, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतला ही माहिती दिली. कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यासाठी आवश्यक असलेल्या कृष्णा-मराठवाडा स्थिरीकरण योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, माळढोक अभयारण्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूर केला आहे. जलसंपदा विभागासाठी दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीला २५ ते ३० टक्क्यांचा कट लावला जातो, असा अनुभव आहे. यंदा मात्र, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ७ हजार २७२ कोटी रुपये अधिक ५०० कोटी अशा एकूण ७ हजार ७७२ कोटी रुपयांचा निधी पूर्णत: वितरित केला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या संनियंत्रण समितीमध्ये गिरीश महाजन यांना सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.दरम्यान, विदर्भ आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील तापी मेगा रिचार्ज योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा भागात आणि बालाघाट जिल्ह्यात सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या शिवाय, धुळे जिल्ह्यातील सुरवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेलाही केंद्रीय जल आयोगाने तांत्रिक मान्यता दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)