शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गिरीश बापट या ‘शकुनीमामा’ने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:12 IST

‘शिवसेनेने ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे.

ठळक मुद्देचाकण येथील एका मंगल कार्यालयात खेड तालुका शिवसेनेच्या वतीने  निर्धार मेळाव्याचे आयोजन

चाकण : ‘‘खासदार गिरीश बापट या शकुनीमामाने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवलं,’ अशी घणाघाती टीका माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे केली. चाकण येथील एका मंगल कार्यालयात खेड तालुका शिवसेनेच्या वतीने  निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले, ‘खासदार गिरीषबापट म्हणजे पुणे जिल्ह्यातील शकुनीमामा आहेत. या शकुनीमामाने शिवसेनेला संपवले. पालकमंत्र्यांना मी पत्र द्यायचो, पण मला त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय येत नव्हता. मात्र काम मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच पदाधिकारी यांच्या नावाने पत्र द्यायची. अशा प्रकारे यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले.

आमदार सुरेश गोरे म्हणाले, ‘विधानसभेला पराभव का झाला याच्यासाठी हा निर्धार मेळावा आहे. आजची उपस्थिती पाहून मला शिवसेनेची खरी ताकद कळाली. विकास कामांबाबत तालुक्याला नवीन दृष्टीकोन दिला. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘शिवसेनेने ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे. शिवसेनेची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. स्वत:च्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या शिवसैनिकांना ताकद द्या. यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, अरुण गिरे आदी उपस्थित होते. .............पराभव होऊन देखील पुन्हा लढण्याची ताकद म्हणजे निर्धार मेळावा. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात त्यांच्या छाताडावर बसून खासदार राहिलो. आज मी ऐशो अरामचे जीवन जगू शकतो, पण नाही माझ्यासाठी जीवाचे रान करणाºया कार्यकर्त्यांसाठी मला लढायचं आहे. त्यांना येणाºया निवडणुकांत त्यांना ताकद द्यायची आहे. शिरूरमध्ये माऊली कटके निवडणुकीला उभे राहिले होते. बाबुराव पाचर्णे यांचा जीव खालीवर झाला. बापट यांच्या सांगण्यावरून माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला. पण नंतर बापट यांना फोन केला की, खेड मधून तुमच्या अतुल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्या, असे सांगितले तर उत्तर आले, अतुल देशमुख यांचा अन माझा संपर्क होत नाही. आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे सांगितले. वाशेरे-नायफड व पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटात शिवसेनेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली, हे चिंताजनक आहे. 

............

* बापट समर्थकांचे प्रत्युत्तरभारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे बहुदा महाराष्ट्रातले पाहिले जनसंपर्क कार्यालय चालू करणारे गिरीश बापटच होते. कसबा मतदारसंघ आणि पुणे शहरात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ता जर कोणी एकत्र बांधून ठेवला तो बापट यांनीच. त्यामुळे आपल्या पराभवाचे खापर बापट यांच्या माथी मारून आपण आपल्या मतदारसंघातली नाराजी लपवू नका. पुणे शहराचे लोकप्रिय खासदार ’ गिरीश बापट हे शकुनीमामा नाहीत तर पश्चिम महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. शिवाजी आढळराव पाटील यांना त्यांचा गड मजबूत करता आला नाही. ते स्वत: पराभूत झाले. बापट हे  ३ लाख २४ हजार मतांनी निवडून आलेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी फक्त एका जागेवर भाजपाचा उमेदवार पराभूत झाला आहे,’ असे प्रत्युत्तर बापट समर्थकांनी दिले आहे.

टॅग्स :Chakanचाकणgirish bapatगिरीष बापटShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक