शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुबईकरांना भावली महाराष्ट्राची स्पेशल केळी! भारतानं केली तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 17:52 IST

जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे.

जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे. पण यात महाराष्ट्रातील एका स्पेशल केळीनं दुबईकरांचं मन जिंकलं आहे. नुकतंच या स्पेशल केळीची एक खेप दुबईला रवाना झाली आहे. 

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील केळींना जगभरात खूप मागणी आहे. याठिकाणी घेतली जाणारी स्पेशल केळीची एक खेप नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. जळगावातील या केळीला GI Tag मिळालं आहे. या स्पेशल केळीची सध्या २२ मेट्रीक टन इतकी पहिली खेप दुबईला पाठविण्यात आली आहे. जळगावच्या तलवंडी गावातील शेतकऱ्यांकडून दुबईकरांनी केळी विकत घेतली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात महाराष्ट्रानं नेहमीच मोलाचं योगदान केलं आहे. जळगावनं ते आज पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. 

जळगावच्या केळींमध्ये स्पेशल काय?महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील केळींमध्ये इतर केळींच्या तुलनेत अधिक फायबर आणि मिनिअलयुक्त असतात. याच खास गुणधर्मामुळे जळगावच्या केळींना २०१६ साली GI टॅग देण्यात आला होता. हा टॅग जळगाव जिल्ह्यातील निसर्गराज कृषी विज्ञान केंद्रासोबत नोंदणीकृत करण्यात आला आहे. 

देशानं केली ६०० कोटींची उलाढालगेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर भारताच्या कृषी क्षेत्राच्या निर्यातीत वाढ झाल्याचा पाहायला मिळालं आहे. यात क्षमता आणि मूल्य या दोन्ही बाबतीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. २०१८-१९ साली भारतानं एकूण १.३४ लाख टन इतकी केळी निर्यात केली आणि याची एकूण उलाढाल ४१३ कोटी रुपये इतकी होती. तर  २०१९-२० या वर्षात कोरोना महामारीमुळे निर्बंध असतानाच्या काळातही देशानं  १.९५ लाख टन केळींची निर्यात केली आणि तब्बल ६६० कोटी रुपयांची उलाढाल केली. तर २०२०-२१ या वर्षात हिच उलाढाल ६१९ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

जगातील एकूण केळी उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन भारतातजगातील केळी उत्पादन देशांमध्ये भारताचं नाव अग्रस्थानी आहे. एकूण उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होतं. यात आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात केळीचं उत्पादन होतं. 

काय असतो GI टॅग?जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच GI टॅग एखाद्या क्षेत्रातील विशेष उत्पादनाला बहाल केला जातो. जेणेकरुन संबंधित उप्तादनाची विशेष भौगोलिक ओळख यातून निश्चित होते. जसं की जळगावची केळी, दार्जिलिंगचा चहा, चंदरी साडी, सोलापूरची चादर, म्हैसूर सिल्क, भागलपुरी सिल्क आणि बिकानेरच्या भुजिया यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावDubaiदुबईfruitsफळे