शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

दुबईकरांना भावली महाराष्ट्राची स्पेशल केळी! भारतानं केली तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 17:52 IST

जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे.

जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे. पण यात महाराष्ट्रातील एका स्पेशल केळीनं दुबईकरांचं मन जिंकलं आहे. नुकतंच या स्पेशल केळीची एक खेप दुबईला रवाना झाली आहे. 

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील केळींना जगभरात खूप मागणी आहे. याठिकाणी घेतली जाणारी स्पेशल केळीची एक खेप नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. जळगावातील या केळीला GI Tag मिळालं आहे. या स्पेशल केळीची सध्या २२ मेट्रीक टन इतकी पहिली खेप दुबईला पाठविण्यात आली आहे. जळगावच्या तलवंडी गावातील शेतकऱ्यांकडून दुबईकरांनी केळी विकत घेतली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात महाराष्ट्रानं नेहमीच मोलाचं योगदान केलं आहे. जळगावनं ते आज पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. 

जळगावच्या केळींमध्ये स्पेशल काय?महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील केळींमध्ये इतर केळींच्या तुलनेत अधिक फायबर आणि मिनिअलयुक्त असतात. याच खास गुणधर्मामुळे जळगावच्या केळींना २०१६ साली GI टॅग देण्यात आला होता. हा टॅग जळगाव जिल्ह्यातील निसर्गराज कृषी विज्ञान केंद्रासोबत नोंदणीकृत करण्यात आला आहे. 

देशानं केली ६०० कोटींची उलाढालगेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर भारताच्या कृषी क्षेत्राच्या निर्यातीत वाढ झाल्याचा पाहायला मिळालं आहे. यात क्षमता आणि मूल्य या दोन्ही बाबतीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. २०१८-१९ साली भारतानं एकूण १.३४ लाख टन इतकी केळी निर्यात केली आणि याची एकूण उलाढाल ४१३ कोटी रुपये इतकी होती. तर  २०१९-२० या वर्षात कोरोना महामारीमुळे निर्बंध असतानाच्या काळातही देशानं  १.९५ लाख टन केळींची निर्यात केली आणि तब्बल ६६० कोटी रुपयांची उलाढाल केली. तर २०२०-२१ या वर्षात हिच उलाढाल ६१९ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

जगातील एकूण केळी उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन भारतातजगातील केळी उत्पादन देशांमध्ये भारताचं नाव अग्रस्थानी आहे. एकूण उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होतं. यात आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात केळीचं उत्पादन होतं. 

काय असतो GI टॅग?जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच GI टॅग एखाद्या क्षेत्रातील विशेष उत्पादनाला बहाल केला जातो. जेणेकरुन संबंधित उप्तादनाची विशेष भौगोलिक ओळख यातून निश्चित होते. जसं की जळगावची केळी, दार्जिलिंगचा चहा, चंदरी साडी, सोलापूरची चादर, म्हैसूर सिल्क, भागलपुरी सिल्क आणि बिकानेरच्या भुजिया यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावDubaiदुबईfruitsफळे