शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:28 PM

मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामे आटोपून ठेवा मुंबईत धडकायचे आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितले. 

तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकतीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचे नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. मुंबई मधील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले आहे. 

छगन भुजबळ काहीही बरळतात. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा, भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार? मराठा, ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई यांच्या जरांगेंना दिल्लीला नेणार या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

आम्हाला ओबीसींमधून आरक्षण हवेय. आमची क्यूरीटीव्ह पीटिशनवर आमची शंका आहे. एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळविणार पाहा तुम्ही, असे आव्हान जरांगे यांनी दिले आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाही, आता कुठेच जात नाही. कायदा पारित करण्यासाठी आम्ही ४० दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली.  समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावले आहे तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये सरसकट घ्या. यादीतील ८३ क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण लागू होईल. मात्र राजकीय इच्छा शक्ती नाही. न्यायालयाने जर सांगितले असेल की जात मागास सिद्ध करा ते आयोगाला सिद्ध करावे लागेल. मात्र, जाचक आटी रद्द करायला पाहिजेत असे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा