शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कमी खर्चात वांग्यातून लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:42 AM

यशकथा : या ७ गुंठ्यांतील वांग्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तीस हजार रु पये खर्च वजा जाता ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. 

- रोहन वावधाने (मानोरी, जि.नाशिक)

सध्या शेतकरी सर्वच बाजूने उदासीन झाला असून, घाम गाळून पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत मानोरी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब बोराडे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आपल्या ७ गुंठे शेतात अजय अंकुर वांग्याची लागवड केली आहे. या ७ गुंठ्यांतील वांग्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तीस हजार रु पये खर्च वजा जाता ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. 

वांगे पिकाची यशस्वी लागवड करून शेतकऱ्यांसमोर त्यांनी नवा आदर्श उभा केला आहे. बाबासाहेब बोराडे यांनी सुरुवातीला ७ गुंठ्यांत ५ बाय ७ अंतरावर बैलजोडीच्या साहाय्याने सरी पाडल्या. त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन करून त्यात प्रत्येकी ५ फुटांच्या अंतरावर वांग्याची रोपे लावली. नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत विहिरीत मुबलक पाणी साठा असल्याने वेळेवर पिकाला पाणी दिले. त्यामुळे झाडे नेहमी हिरवीगार राहत होती. फेब्रुवारीनंतर मात्र पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाल्याने बोराडे यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून वांग्याची झाडे जगवली.

वातावरणात बदल झाल्यास किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने बुरशीनाशक, पोषक, काईट, नोवान, क्लोरो कीटकनाशकांची वेळोवेळी फवारणी केली, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. येवला, मुखेड, जळगाव नेऊर, देवगाव, देशमाने, लासलगाव आदी गावांतील आठवडी बाजारात जाऊन बाबासाहेब बोराडे ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने हात विक्री करतात. यापुढे सुमारे दोन महिने वांग्याचे उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यातून त्यांना २५ हजार रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. इतर शेतकऱ्यांनीही अशा नव्या पीकपद्धतीच्या अवलंब करून कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणाऱ्या भाजीपाल्याची लागवड केल्यास शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते, असे बोराडे सांगतात.

व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत म्हणून ओरड करण्यापेक्षा आपल्या पिकासाठी आपणच बाजारपेठ निर्माण केल्यास त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो हे बोराडे यांच्या प्रयत्नातून दिसून येते. वांगे तोडून ते थेट आठवडी बाजारात नेणे आणि स्वत:च त्याची विक्री केल्याने बाजाराचा नेमका कलही त्यांना समजला. येवला तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे असतो, कांद्याला हजार रुपये क्विंटल भाव मिळाला तरी परवडते, असे शेतकरी म्हणतात. कांद्यापेक्षा इतर पिकातही चांगला पैसा मिळू शकतो, हेच या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक पीक करण्यापेक्षा वेगळा प्रयोग करण्यास काय हरकत आहे? आपण पिकवलेला माल आपणच विकला तर जास्तीचे पैसे मिळतील.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र