नागपुरात गँगवॉर भडकले
By Admin | Updated: June 22, 2014 01:03 IST2014-06-22T01:03:00+5:302014-06-22T01:03:00+5:30
उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील शत्रुत्वाचा भडका उडाल्याने अवघ्या 2क् तासांत चार गुन्हेगारांना त्यांच्या प्रतिस्पर्धीनी संपविले.

नागपुरात गँगवॉर भडकले
>2क् तासांत चार खून : नंदनवनमध्ये गुन्हेगाराच्या टोळीने प्रतिस्पर्धीना संपविले, तीन ठार
नागपूर : उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील शत्रुत्वाचा भडका उडाल्याने अवघ्या 2क् तासांत चार गुन्हेगारांना त्यांच्या प्रतिस्पर्धीनी संपविले. नंदनवनमध्ये शुक्रवारी रात्री राहुल चेपटय़ाच्या टोळीतील तिघांचा खून झाला. तर शनिवारी रात्री कळमन्यातील कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ युवराज रहांगंडाले याचाही खून झाला़ हसनबागमध्ये समशेर टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांच्या खूनाचा प्रयत्न केला. या खून सत्रमुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे.
शहरातील दोन कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील वैमनस्याचा शुक्रवारी रात्री भडका उडाला. एका टोळीतील गुन्हेगारांनी दुस:या टोळीतील चार जणांवर स्कॉर्पिओ घालून चिरडले. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. तर, एक गंभीर जखमी झाला.
दरम्यान, प्रतिस्पर्धीना ठार मारण्याच्या प्रय}ात आरोपींची स्कॉर्पिओसुध्दा ट्रकवर आदळल्याने दोन आरोपी गंभीर जखमी झाले. नंदनवन पोलीसांच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 11.3क् वाजता ही घटना घडली. मृताचे नाव रशिदखान नसिमखान ऊर्फ भाईजान आणि अब्दुल अशी आहेत. हे तसेच प्रदीप भारत घोडे आणि रोहित नारनवरे हे चौघे राहुल (चेपटय़ा) मेश्रमच्या टोळीतील गुंड होत. कब्जा आणि खंडणी वसुलीच्या निमित्ताने दीड-दोन वर्षापूर्वी राहुल चेपटय़ा आणि जगदीश कोसूरकर, दिलीप कोसूरकर या गुंडांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. यातून हा गँगवॉर भडकल्याचे समजत़े (प्रतिनिधी)