शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

“गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 11:04 IST

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं.

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरखैरणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तर या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे माझ्याबद्दलची जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली. नाईक यांना माहित होते आपली औकात संपली असून, आपण मीरा-भायंदर, ठाणे, नवी मुंबई येथून मागे पडू आणि निवडून येणार नाही. त्यामुळे निवडून येण्याची खात्री नसल्याने फक्त मला बदनाम करण्यासाठी नाईक यांनी पवारांना माझ नाव सांगितेले असल्याचं आव्हाड म्हणाले.

तर आम्ही मेहनत करून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवून टाकला. जेव्हा कल्याण- डोंबिवलीमध्ये आमचा महापौर होता, त्यावेळी नाईक कुठेच नव्हते. मात्र नाईक राष्ट्रवादीत आले आणि कल्याण- डोंबिवलीमधुन त्यांनी राष्ट्रवादी संपवून टाकली. डोंबिवलीमधुन मी 9 नगरसेवक निवडून आणले होते, मात्र त्यांनी ते 1 वर आणले असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं. तर गणेश नाईक यांच्यामुळे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.