शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

“गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 11:04 IST

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं.

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरखैरणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तर या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे माझ्याबद्दलची जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली. नाईक यांना माहित होते आपली औकात संपली असून, आपण मीरा-भायंदर, ठाणे, नवी मुंबई येथून मागे पडू आणि निवडून येणार नाही. त्यामुळे निवडून येण्याची खात्री नसल्याने फक्त मला बदनाम करण्यासाठी नाईक यांनी पवारांना माझ नाव सांगितेले असल्याचं आव्हाड म्हणाले.

तर आम्ही मेहनत करून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवून टाकला. जेव्हा कल्याण- डोंबिवलीमध्ये आमचा महापौर होता, त्यावेळी नाईक कुठेच नव्हते. मात्र नाईक राष्ट्रवादीत आले आणि कल्याण- डोंबिवलीमधुन त्यांनी राष्ट्रवादी संपवून टाकली. डोंबिवलीमधुन मी 9 नगरसेवक निवडून आणले होते, मात्र त्यांनी ते 1 वर आणले असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं. तर गणेश नाईक यांच्यामुळे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.