शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

“गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 11:04 IST

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं.

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरखैरणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तर या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे माझ्याबद्दलची जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली. नाईक यांना माहित होते आपली औकात संपली असून, आपण मीरा-भायंदर, ठाणे, नवी मुंबई येथून मागे पडू आणि निवडून येणार नाही. त्यामुळे निवडून येण्याची खात्री नसल्याने फक्त मला बदनाम करण्यासाठी नाईक यांनी पवारांना माझ नाव सांगितेले असल्याचं आव्हाड म्हणाले.

तर आम्ही मेहनत करून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवून टाकला. जेव्हा कल्याण- डोंबिवलीमध्ये आमचा महापौर होता, त्यावेळी नाईक कुठेच नव्हते. मात्र नाईक राष्ट्रवादीत आले आणि कल्याण- डोंबिवलीमधुन त्यांनी राष्ट्रवादी संपवून टाकली. डोंबिवलीमधुन मी 9 नगरसेवक निवडून आणले होते, मात्र त्यांनी ते 1 वर आणले असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.

गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं. तर गणेश नाईक यांच्यामुळे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.