उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी आता गांधीगिरी!
By Admin | Updated: September 15, 2014 23:27 IST2014-09-15T23:27:46+5:302014-09-15T23:27:46+5:30
पुणो शहर परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपूजन करण्यात आले.

उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी आता गांधीगिरी!
लोणी देवकर : पुणो शहर परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपूजन करण्यात आले. यामध्ये अनेक राजकीय पुढारी व शेतकरी बांधवांनी हजेरी लावली.
या वेळी पाणीप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. भविष्यकाळात ते रोखण्यासाठी उजनी बचाव समितीच्या वतीने समाजात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय करण्यात आला. शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना होत नसल्याने गांधीगिरीच्या मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे उजनी बचाव समितीच्या पदाधिका:यांनी या वेळी बोलताना सांगितले.
जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत उजनी धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांर्पयत भरलेला असतो, हे आजवरचे गणित आहे. परंतु, चालू वर्षी संपूर्ण जून
महिना संपला तरी पावसाचा कोठे लवलेशही नव्हता.
उजनी धरणावर आधारित असणा:या पुणो-सोलापूर व नगर जिल्ह्यातील शेतकरी उद्योजकांसह सर्वाच्याच नजरा पावसासह उजनी धरणातील पाण्यावर लागून राहिल्या होत्या. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पुणो व त्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्केभरले आहे.
या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल खोत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विशाल बोंद्रे, चंद्रकांत जाधव, माथाडी कामगार संघटनेचे विलास बोराडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे, पळसदेव भीमा उपसा सिंचनचे शाखा अभियंता पांडुरंग गावंड, नाभिक समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादा ¨शंदे, मच्छीमार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष पोपट नगरे, अनिल नगरे, अॅड. महेश ढुके, शीतल नगरे आदींच्या हस्ते विधिवत उजनी धरणातील पाण्याचे पूजन करून श्रीफळ अर्पण करण्यात आला. (वार्ताहर)
4राज्यातील मोठय़ा धरणात गणती होणा:या उजनी धरणाच्या पाण्यावर जवळपास तीन ते चार जिल्ह्यांतील शेतकरीबांधवांच्या नजरा असतात.
4या पाण्यावरच अनेक उद्योग व मोठय़ा प्रमाणात पुणो, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेती फुलत आहे.
4धरण शंभर टक्केभरल्याने मोठय़ा प्रमाणात जलपूजन करण्यात आले. यामध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिका:यांसमवेत शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली.