शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 19 दिवस उशिराने येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 08:51 IST

या वर्षी गणेश चतुर्थी शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी आली. परंतु, पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशिराने म्हणजेच गुरुवार...

ठळक मुद्देया वर्षी गणेश चतुर्थी शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी आली. परंतु, पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशिरानेगणेशभक्तांच्या माहितीकरिता त्यांनी पुढील २१ वर्षांतील गणेश चतुर्थीचे दिवस आणि कोणत्या वर्षी कोणता अधिक महिना येणार आहे, त्याची माहितीही दिली.

ठाणे, दि. 27 - या वर्षी गणेश चतुर्थी शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी आली. परंतु, पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशिराने म्हणजेच गुरुवार, १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.गणेशभक्तांच्या माहितीकरिता त्यांनी पुढील २१ वर्षांतील गणेश चतुर्थीचे दिवस आणि कोणत्या वर्षी कोणता अधिक महिना येणार आहे, त्याची माहितीही दिली. ती माहिती सोशल मीडियावर फिरत आहे.

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप-

 संततधारेने कोसळणा-या पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले. महापालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनासाठी त्या त्या विभागांत विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.शुक्रवारी गणेशाचे घराघरांत वाजतगाजत आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतला पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवार सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे गणेशभक्तांची काही प्रमाणात गैरसोय झाली. असे असले तरी चिंब पावसाची तमा न बाळगता, भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. शनिवारी दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाशी तलाव, कोपरखैरणे, कोपरी तसेच घणसोली गोठीवली, ऐरोली, सानपाडा, नेरुळ, सीबीडी आदी भागांतील तलावात श्रीच्या मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात व ‘गणपती बाप्पा मोºया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात विसर्जन करण्यात आले.पनवेलमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. विसर्जनासाठी शहरातील तलावात तर ग्रामीण भागात नदीमध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली होती. पुढच्या वर्षी लवकर या... असे आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपतीचे शुक्र वारी आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी व्यक्त केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करीत दीड दिवसांच्या बाप्पाला हजारो भाविकांनी निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात शनिवारी विसर्जन करण्यात आले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा फटका विसर्जन कार्याला बसला. विसर्जनाला जाणाºया गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. विशेषत: ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, गोठीवली, कोपरी या भागांतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने खड्ड्यांत पाणी साचून त्याचे डबक्यात रूपांतर झाले आहे. अशा खड्डेमय व जलमय रस्त्यावरून श्रीच्या विसर्जनाची मिरवणूक काढताना भक्तांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव