शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर नेणार, गडकरी अन् मुख्यमंत्र्यांची ग्वाही ; दोन वर्षांत देणार ६० हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 5:06 AM

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी येत्या दोन वर्षांत ५५ ते ६० हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाईल आणि सध्या २२ टक्के असलेले सिंचन क्षेत्र राज्याच्या मदतीने दोन वर्षांत ४० टक्क्यांवर नेले जाईल

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी येत्या दोन वर्षांत ५५ ते ६० हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाईल आणि सध्या २२ टक्के असलेले सिंचन क्षेत्र राज्याच्या मदतीने दोन वर्षांत ४० टक्क्यांवर नेले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय जलसंपदा व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रपरिषदेत दिली.सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक गडकरींच्या मुख्य उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. जलसंपदा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील प्रकल्पांसाठी घेतलेल्या या पहिल्याच बैठकीत गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन वर्षांत सिंचन आणि रस्त्यांबाबत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प केला.

गडकरी म्हणाले की, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्राकडून एक हजार कोटी तत्काळ दिले जातील. एकूण २५ हजार कोटी केंद्र देईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या कर्जाचा हिस्सा १५ दिवसांत मिळेल. अवर्षणप्रवण आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांसाठी राज्याने मागणी केलेले १०,५०० कोटी देण्यासंदर्भात वित्त मंत्री अरुण जेटली यांच्यासोबत बैठक घेऊ. शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, इतक्या सिंचन सुविधा निर्माण केल्या जातील. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.नदीजोड प्रकल्पाचाश्रीगणेशा महाराष्ट्रातूनमहाराष्ट्र आणि गुजरात सरकारच्या संयुक्त सहकार्यातून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प उभारण्याचे काम येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येईल आणि हा देशातील पहिलाच नदीजोड प्रकल्प असेल, अशी ग्वाही गडकरी व फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात १२ वा १३ सप्टेंबरला फडणवीस व गुजरातचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारशी करार होणार आहे.खड्डे ३१ डिसेंबरपर्यंतबुजविणार : पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे येत्या डिसेंबरपर्यंत बुजवावेत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विभागाच्या अधिकाºयांना बैठकीत दिले. खड्डे बुजविण्याच्या निविदांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर ते काम स्वत: बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.याशिवाय, तापीच्या एका खोºयातील पाणी दुसºया (गोदावरी) खोºयात नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच पार-तापी नदीजोड प्रकल्पही हाती घेण्यात येणार असून दोन्ही प्रकल्पांवर २० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.घोटाळ्यांची चौकशी वेगानेच : फडणवीसआघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांच्या चौकशीची गती कुठेही मंदावलेली नाही. आतापर्यंत चार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. एकेक अरोपपत्र ३० हजार पानांचे आहे. त्यामुळे वेळ लागतो. बाकीच्यांची चौकशी पूर्ण होईल, तसतसे आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नात सांगितले.गडकरी अन् मुख्यमंत्र्यांची ग्वाही : दोन वर्षांत देणार ६० हजार कोटी

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस