शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

कोकणासह गडचिरोलीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:07 IST

राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पुणे : राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही पाऊस सक्रिय झाला असून परभणीत जोरदार सरी बरसल्या. जालना, बीड, हिंगोली, लातूरसह औरंगाबाद शहरातही रिमझिम पाऊस झाला.पावसाने पश्चिम महाराष्ट्राही सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस होता. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यांना पावसाने झोडपून काढले असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदा पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२०० घनफूट पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पातळी वाढली आहे. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील अकरा बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. पलूस, कडेगाव तासगाव तालुक्यातील पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गेल्या २४ तासात पाणीसाठा एक टीएमसीने वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोेट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार कायम आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने पाणीसाठ्यात चोवीस तासांत चार टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे धरणात सध्या ५२.३६ पाणीसाठा झाला आहे. कोकणात धुमशान कोकणात अक्षरक्ष: पावसाचे धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर आला असून दुपारी खेड आणि संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्री जोरदार वादळ झाले. रत्नागिरी परिसरालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्रीपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने आंबेरी, दुकानवाड, पुळास येथील पुलावर पाणी आले असून, खोऱ्यातील तब्बल २७ गावांचा पूर्णत: संपर्क तुटला आहे. या परिसरातील शाळाही लवकर सोडून देण्यात आल्या. रात्री एस.टी. वाहतूक पूर्णत: ठप्प झाली असून, अनेक प्रवाशी दुकानवाड, शिवापूर तसेच अन्य गावात अडकून पडले आहेत. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने एकच तारांबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातही संततधार पाऊस झाला. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांची जलपातळी सोमवारी सायंकाळी पूर रेषेजवळ पोहोचल्याने नदी किनाऱ्याच्या सुमारे २४५ गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. मात्र पहाटेच्या सुमारास पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टळला आहे. कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू होती. नागपूरात हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टीविदर्भातही पाऊस सक्रिय असून नागपूर शहरात तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर धो-धो पाऊस बरसला. गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली़धरणांमधील साठा वाढलाधरण क्षेत्रात संततधार सुरु असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणामधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे़ भिमा खोऱ्यातील २५ पैकी ६ धरणांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे़ मावळमधील पडत असलेल्या पावसाने आंध्रा धरण एकाच दिवसात ९९़५५ टक्के भरले आहे़ चासकमान धरण ८०़५१ टक्के भरले असून धरणातून नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ येडगाव ८१़४८ टक्के, कळमोडी १०० टक्के, कासारसाई ८७़६७ टक्के धरले आहे़ पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतरअतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याने महाराष्ट्रात आणखी ३ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे़