शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणासह गडचिरोलीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:07 IST

राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पुणे : राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही पाऊस सक्रिय झाला असून परभणीत जोरदार सरी बरसल्या. जालना, बीड, हिंगोली, लातूरसह औरंगाबाद शहरातही रिमझिम पाऊस झाला.पावसाने पश्चिम महाराष्ट्राही सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस होता. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यांना पावसाने झोडपून काढले असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदा पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२०० घनफूट पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पातळी वाढली आहे. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील अकरा बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. पलूस, कडेगाव तासगाव तालुक्यातील पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गेल्या २४ तासात पाणीसाठा एक टीएमसीने वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोेट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार कायम आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने पाणीसाठ्यात चोवीस तासांत चार टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे धरणात सध्या ५२.३६ पाणीसाठा झाला आहे. कोकणात धुमशान कोकणात अक्षरक्ष: पावसाचे धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर आला असून दुपारी खेड आणि संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्री जोरदार वादळ झाले. रत्नागिरी परिसरालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्रीपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने आंबेरी, दुकानवाड, पुळास येथील पुलावर पाणी आले असून, खोऱ्यातील तब्बल २७ गावांचा पूर्णत: संपर्क तुटला आहे. या परिसरातील शाळाही लवकर सोडून देण्यात आल्या. रात्री एस.टी. वाहतूक पूर्णत: ठप्प झाली असून, अनेक प्रवाशी दुकानवाड, शिवापूर तसेच अन्य गावात अडकून पडले आहेत. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने एकच तारांबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातही संततधार पाऊस झाला. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांची जलपातळी सोमवारी सायंकाळी पूर रेषेजवळ पोहोचल्याने नदी किनाऱ्याच्या सुमारे २४५ गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. मात्र पहाटेच्या सुमारास पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टळला आहे. कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू होती. नागपूरात हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टीविदर्भातही पाऊस सक्रिय असून नागपूर शहरात तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर धो-धो पाऊस बरसला. गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली़धरणांमधील साठा वाढलाधरण क्षेत्रात संततधार सुरु असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणामधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे़ भिमा खोऱ्यातील २५ पैकी ६ धरणांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे़ मावळमधील पडत असलेल्या पावसाने आंध्रा धरण एकाच दिवसात ९९़५५ टक्के भरले आहे़ चासकमान धरण ८०़५१ टक्के भरले असून धरणातून नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ येडगाव ८१़४८ टक्के, कळमोडी १०० टक्के, कासारसाई ८७़६७ टक्के धरले आहे़ पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतरअतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याने महाराष्ट्रात आणखी ३ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे़