शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांमधील असमन्वयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 16:15 IST

विविध पर्यांयांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनांवर अर्थात राज्यातील विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर हा घाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

मुंबई: अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थी पालकांसाठी आता दिव्यच झाले असून, याचा निर्णय होता होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यावर राज्यपालांनी आता त्यावर बोट ठेवून विद्यापीठ नियमांप्रमाणे परीक्षा झाल्या पाहिजेत, असे निर्देश दिल्यानंतर विद्यार्थी प्रचंड गोंधळले आहेत. एकीकडे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर अथवा विविध पर्यांयांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनांवर अर्थात राज्यातील विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर हा घाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे, तर दुसरीकडे परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध केल्याने राज्यपाल राजभवनात बसून हे ८ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असल्याचे उद्विग्न ट्विट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्यामधील असमन्वय, राजकीय पक्षांमधील विभिन्न भूमिका अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना कोणत्या निर्णयाअंती पोहोचविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.यापूर्वीही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीला लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांनी आक्षेप घेतला होता आणि त्यासाठी आपल्याला विचारात घेतले नसल्याचेही म्हटले होते. मात्र त्यानंतर सामंत यांनी फोनवरून राज्यपालांची समजूत काढून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्र्यांचा विचार घेऊन अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र उच्च व तंत्र शिक्षण समितीला प्राप्त कुलगुरुंचा आपल्याला मिळाला नसल्याचे आणि  विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण केलेल्या संवादादरम्यान अनेक कुलगुरूंनी परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यापीठ कायद्याप्रमाणे परीक्षा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. तसेच जुलैमध्ये शाळा सुरू करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करणे आणि दुसरीकडे त्याच महिन्यात होऊ घातलेल्या अंतिम सत्राच्या प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न असल्याचा आरोप अभाविपकडूनही  करण्यात आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे याची आकडेवारी सांगत असताना दुसरीकडे असा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे राज्य सरकार  परीक्षा घेण्याच्या जवाबदारीतून हात झटकत असल्याचा आरोप अभाविपचे अनिकेत ओव्हाळ यांनी केला.राज्यपाल आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामध्ये परीक्षा होणार की नाही या संभ्रमात असलेले विद्यार्थी पालक यांच्या संयमाचा बांध मात्र आता सुटत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जर परीक्षा घ्यायचीच असेल तर तसा निर्णय जाहीर करावा किंवा ऑनलाईन परीक्षांसारखा काही पर्याय सुचवावा. मात्र तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही लागू पडेल, असा असावा याची काळजी घ्यावी. परीक्षा होणार की नाही या गोंधळात परीक्षांचे केवळ राजकारण होत आहे असे वाटत असल्याची प्रतिक्रिया आयडॉलचा विद्यार्थी असलेल्या प्रथमेश शिंदे याने दिली. यामुळे विद्यार्थ्यांवरचा मानसिक त्रास वाढत असून राजकारण करत बसण्यापेक्षा निर्णय लवकर घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षा अनेक विद्यार्थी करत असल्याचे मत त्याने मांडले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस