शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र सैनिकांना केलं असं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 18:26 IST

Raj Thackeray: राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांवरून राजकारणही तापलेलं आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेंव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल, असं राज ठाकरे यांनी आपल्या आवाहनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आज पनवेलमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली. २००७ साली सुरु झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र तरी देखील या रस्त्याचे काम अर्धवटच असुन जनतेने निवडणूक दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेroad transportरस्ते वाहतूक