शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 16:14 IST

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. 

मुंबई : काल मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला. यामुळे माझ्या वरिष्ठांना, हितचिंतकांना वेदना झाल्या. मी उपमुख्यमंत्री असतानाही असाच एक प्रसंग आला होता. मी कोणालाही न विचारता राजीनामा दिला होता. कालही हाच प्रकार केला. मी कार्यकर्त्यांचीही माफी मागतो, असे अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. 

विधानभवनामध्ये मी 5.30 च्या सुमारास गेलो. विधानसभाध्यक्ष बागडेंच्या पीएकडे राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी मी त्यांना फोन केलेला, की तुम्ही मुंबईत कधी आहात असे विचारले होते. मी राज्य बँकेचा संचालक होतो. शरद पवार हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले. राज्य बँकेने एखाद्या गिरणीला, कारखान्याला पैसे दिले ते त्यांनी कसे खर्च केले त्याची चौकशी केली तर मला काही आक्षेप नाही. अन्याय झाला तर न्यायपालिका आहेत. त्यांनी त्यांना हवा तो तपास करावा. मात्र, 2008 चे प्रकरण असताना आज निवडणुकीच्या काळात का गुन्हा दाखल केला. यामुळे शरद पवारांना या गोष्टीचा त्रास झाला, असेही त्यांनी सांगितले. 

मी सकाळी मुंबईकडे निघालो. मात्र, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे निघाल्याने टोल नाक्यांवर माझे दोन दोन तास गेले. दुपारी 2 वाजता मी मुंबईत पोहोचलेलो. तोपर्यंत ईडीकडे न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. त्यामुळे माध्यमांनी लगेचच अजित पवार आले नसल्याची विचारणा सुरू केली. राजीनामा दिल्यानंतर मी मुंबईतील एका नातोवाईकाकडे थांबलो. शरद पवारांनी मला भेटण्यास सांगितले. आमच्यात कौटुंबीक कलह कुठून आले? असा सवालही त्यांनी केला. 

हे थांबवा...मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हाही आमच्यात कलह असल्याची चर्चा केली गेली. शरद पवार आणि अजितदादा यांचे दोन गट असल्याचे बोलले गेले. सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही हेच घडले आणि आताही तेच. पवार कुटुंब मोठा परिवार आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत तेव्हा हे कृपया थांबवा असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस