शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बारावी प्रवेशाचा मार्ग मोकळा, विद्यार्थ्यांना दिलासा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:04 IST

बारावी प्रवेशाची प्रक्रिया आॅफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. हे प्रवेश आॅनलाइन घेण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, याबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेश आॅफलाइन घ्यावा की नाही, असा प्रश्न उभा राहिला होता.

मुंबई - बारावी प्रवेशाची प्रक्रिया आॅफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. हे प्रवेश आॅनलाइन घेण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, याबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेश आॅफलाइन घ्यावा की नाही, असा प्रश्न उभा राहिला होता. परंतु वेळेत हा निर्णय होत नसल्याने बारावीचे प्रवेश रखडले होते. अखेर ही प्रवेश प्रक्रिया आॅफलाइन पद्धतीने राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून गुरुवारी यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले.अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीत मुले नापास होतात किंवा काही कारणांमुळे महाविद्यालय सोडून जातात परिणामी तेथेही बारावीसाठी काही जागा रिक्त होतात. त्यामुळे त्या जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडते. अकरावी आॅनलाइनमध्ये आपल्याला पाहिजे ते महाविद्यालय मिळाले नाही म्हणून काही विद्यार्थी बारावीच्या या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात, असे समोर आले. ही प्रक्रिया आॅफलाइनच होत असल्यामुळे येथे अनेक आर्थिक व्यवहार होतात. त्यामुळे अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. यंदा बारावी प्रवेश आॅफलाइन कह आॅनलाइन होणार, याबाबत संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर बारावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे उपसंचालक विभागातर्फे सांगण्यात येत होते. मात्र आता शासनाने बारावी प्रवेश आॅफलाइन होणार अशा सूचना जारी केल्या आहेत. प्रवेश आॅफलाइनच ठेवण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना बारावीत पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे शक्य होईल.

टॅग्स :educationशैक्षणिकMaharashtraमहाराष्ट्र