शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 09:04 IST

आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे असं फडणवीसांनी सांगितले.

मुंबई – मुलुंड-ठाणे टोलदरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमरण उपोषणाचं आंदोलन हाती घेतले होते. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट देत जाधव यांचे उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र या भाजपा-शिवसेनेच्या जाहिरनाम्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळाच दावा केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्यातील सर्व टोलवर खरेच चारचाकी वाहनांकडून टोल घेतला जात नाही का असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.

याबाबत लोकमतने सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फडणवीसांचं विधान अर्धसत्य असल्याचे सांगितले. वेलणकर म्हणाले की,  २०१५ साली काही टोलनाके बंद केले होते, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट दिली होती. त्यात पुणे-औरंगाबाद रोडवरील टोल आहे. परंतु सगळ्याच ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आली नाही. आजही मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई प्रवेश एन्ट्री पाँईट(वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड) त्याचसोबतचे MSRDC चे टोलनाके, मुंबई-वांद्रे सागरी महामार्ग, समृद्धी महामार्ग याठिकाणी चारचाकी वाहनांना टोल आकारला जातो असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्य सरकारने टोल कंत्राटदारांना दिलेले पैसे ही एकप्रकारची सर्वसामान्यांची लूट आहे. प्रत्येक टोलचा कॅपिटल आऊटलेट जाहीर झाला पाहिजे. किती पैसे खर्च झाले, किती वसूल झाले याची माहिती ठळकपणे दिली पाहिजे. पुणे-मुंबई एक्सप्रेस तयार होताना त्यातील ६० टक्के उत्पन्न टोलमधून तर ४० टक्के उत्पन्न जागा एक्सप्रेसच्या बाजूची जागा यातून मिळवणार होते. कॅपिटल आऊटलेटमध्ये हे सर्व सविस्तर सांगितले जाते. टोल कायद्यानुसार कॅपिटल आऊटलेट जाहीर करणे बंधनकारक आहे परंतु कुठेही असे केले जात नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमुक्त विधानावरून मनसेने खोचक टोला लगावला आहे. मनसेनं ट्विट करत म्हटलंय की, टोलमुक्त महाराष्ट्र झाला देखील आणि महाराष्ट्राला कळलं देखील नाही..किती 'भूल'थापा माराल. खरंच राजसाहेबांनी जे नाव ठेवलं होतं ते अगदी चपखल आहे... भाजपकुमार थापाडे  अशा शब्दात फडणवीसांवर टीका केली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे