शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Maharashtra Politics: “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:09 IST

Maharashtra News: भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा असून, महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक प्रभाव सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर दिसून येईल. आगामी लोकभा निवडणूक ही काँग्रेससाठी अतिशय आव्हानात्मक असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा पराभव काँग्रेसला करावाच लागेल, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 

कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत आहे. भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा आहे. नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशातील, विखारी आणि विषारी वातावरण कायम राहणार आहे. म्हणूनच बदल अतिशय गरजेचा आहेत. त्यासाठी येऊ घातलेल्या निवडणुका जिंकाव्याच लागतील, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान 

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली आहे. त्यामुळे 'जी २३' चा हेतू सफल झाला आहे. पण निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले, असे सांगत, आता नवे अध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे हे चांगले काम करतील. नजीकच्या काळात हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. तर २०२४ ला लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्याचा अभ्यास करूनच यापुढील वाटचाल होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही 

राज्यातील सरकारची स्थिती विदारक आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच महाराष्ट्रात येत असलेल्या भारत जोडो यात्रेसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ही यात्रा तिरंगा झेंड्याखाली होत आहे. पण यात सहभागी व्हायची की नाही हा त्यांचा निर्णय राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सन २०१४ साली राज्यातील आमचे सरकार पाडले नसते तर पुन्हा आमचेच सरकार सत्तेत आले असते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे, हे सर्वांना माहीत आहे अशी टीका नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार