शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Maharashtra Politics: “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:09 IST

Maharashtra News: भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा असून, महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक प्रभाव सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर दिसून येईल. आगामी लोकभा निवडणूक ही काँग्रेससाठी अतिशय आव्हानात्मक असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा पराभव काँग्रेसला करावाच लागेल, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 

कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत आहे. भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा आहे. नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशातील, विखारी आणि विषारी वातावरण कायम राहणार आहे. म्हणूनच बदल अतिशय गरजेचा आहेत. त्यासाठी येऊ घातलेल्या निवडणुका जिंकाव्याच लागतील, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान 

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली आहे. त्यामुळे 'जी २३' चा हेतू सफल झाला आहे. पण निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले, असे सांगत, आता नवे अध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे हे चांगले काम करतील. नजीकच्या काळात हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. तर २०२४ ला लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्याचा अभ्यास करूनच यापुढील वाटचाल होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही 

राज्यातील सरकारची स्थिती विदारक आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच महाराष्ट्रात येत असलेल्या भारत जोडो यात्रेसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ही यात्रा तिरंगा झेंड्याखाली होत आहे. पण यात सहभागी व्हायची की नाही हा त्यांचा निर्णय राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सन २०१४ साली राज्यातील आमचे सरकार पाडले नसते तर पुन्हा आमचेच सरकार सत्तेत आले असते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे, हे सर्वांना माहीत आहे अशी टीका नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार