शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:09 IST

Maharashtra News: भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा असून, महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक प्रभाव सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर दिसून येईल. आगामी लोकभा निवडणूक ही काँग्रेससाठी अतिशय आव्हानात्मक असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा पराभव काँग्रेसला करावाच लागेल, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 

कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत आहे. भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा आहे. नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशातील, विखारी आणि विषारी वातावरण कायम राहणार आहे. म्हणूनच बदल अतिशय गरजेचा आहेत. त्यासाठी येऊ घातलेल्या निवडणुका जिंकाव्याच लागतील, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान 

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली आहे. त्यामुळे 'जी २३' चा हेतू सफल झाला आहे. पण निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले, असे सांगत, आता नवे अध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे हे चांगले काम करतील. नजीकच्या काळात हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. तर २०२४ ला लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्याचा अभ्यास करूनच यापुढील वाटचाल होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही 

राज्यातील सरकारची स्थिती विदारक आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच महाराष्ट्रात येत असलेल्या भारत जोडो यात्रेसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ही यात्रा तिरंगा झेंड्याखाली होत आहे. पण यात सहभागी व्हायची की नाही हा त्यांचा निर्णय राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सन २०१४ साली राज्यातील आमचे सरकार पाडले नसते तर पुन्हा आमचेच सरकार सत्तेत आले असते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे, हे सर्वांना माहीत आहे अशी टीका नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार