माजी अॅटर्नी जनरल वहानवटी यांचे निधन
By Admin | Updated: September 3, 2014 03:08 IST2014-09-03T03:08:04+5:302014-09-03T03:08:04+5:30
भारताचे माजी अॅटर्नी जनरल गुलामहुसैन इसाजी वहानवटी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी येथे निधन झाले.

माजी अॅटर्नी जनरल वहानवटी यांचे निधन
मुंबई: भारताचे माजी अॅटर्नी जनरल गुलामहुसैन इसाजी वहानवटी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी येथे निधन झाले. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक विधी अधिका:याच्या पदावर नियुक्त झालेले ते पहिलेच मुस्लिम होते.
फुफ्फुसाच्या संसर्गामुळे वहानवटी गेले काही दिवस आजारी होते व त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी इस्पितळात दाखल केले होते. तेथेच सा. 5.45 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विविहित कन्या व मुलगा असा परिवार आहे.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट ङोवियर्स कॉलेजात, तर कायद्याचे शिक्षण शासकीय विधी महाविद्यालयात झाले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक गाजलेल्या व वादग्रस्त प्रकरणांमध्ये राज्य/केंद्र सरकारचा यशस्वीपणो बचाव केला होता.
घटनात्मक, कंपनी, दिवाणी, फौजदारी व प्रशासकीय अशा कायद्याच्या विविध अंगांचे व्यासंगी ज्येष्ठ वकील असलेले वहानवटी 2क्क्4 पूर्वी पाच वर्षे महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल होते. केंद्रात पहिले संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर जून 2क्क्4 ते जून 2क्क्9 या काळात त्यांना देशाच्या सॉलिसिटर जनरल पदावर नेमले गेले. 2क्क्9 मध्ये संपुआ-2 चे सरकार आल्यावर त्यांची देशाचे 13 वे अॅटर्नी जनरल म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर त्याच पदावर त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ दिली गेली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर यंदाच्या 27 मे रोजी त्यांनी अॅटर्नी जनरलपदाचा राजीनामा दिला. (प्रतिनिधी)
वादग्रस्त कारकीर्द
अॅटर्नी जनरल म्हणून वहानवटी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांच्या हाताखालील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हरीन पी. रावल यांनी त्यांच्यावर औचित्यभंग व जुलूम जबरदस्तीचा आरोप करून एप्रिल 2क्13 मध्ये राजीनामा दिला होता. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातही त्यांच्यावर आरोप झाले व सीबीआयनेही काही काळ त्यांच्या भूमिकेचा तपास केला होता.