शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुरावा विसरा, एकजुटीने कामाला लागा, अमित शाह यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 20:56 IST

शिवसेना आणि भाजपा राज्य आणि केंद्रात एकत्र असले तरी त्यांच्यात तीव्र मनभेद निर्माण झाले होते. मात्र आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गळाभेट घेत युतीमधील दुरावा संपुष्टात आणला.

मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली होती. त्यानंतर दोन्ही पक्ष राज्य आणि केंद्रात एकत्र असले तरी त्यांच्यात तीव्र मनभेद निर्माण झाले होते. मात्र आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्षअमित शहा यांनी गळाभेट घेत युतीमधील दुरावा संपुष्टात आणला. यावेळी शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती व्हावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्र आहे. काही कारणांमुळे आपल्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र तो दुरावा आज या क्षणापासून विसरा आणि एकजूट होऊन कामाला लागा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. शिवसेना आणि भाजपाची युती निश्चित झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी अमित शहा म्हणाले की''शिवसेना आणि भाजपा युती व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. गेल्या काही काळात आमच्यात मतभेद होऊन काही दुरावा निर्माण झाला होता. मात्र जो काही दुरावा होता तो आज इथे संपुष्टात आणा.'' अमित शहा पुढे म्हणाले की, ''भाजपा आणि शिवसेनेमधील युती ही केवळ राजकीय नाही तर वैचारिक पार्श्वभूमीवर आधारलेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात एनडीएचे सरकार आहे. त्यात शिवसेना सहभागी आहे. केंद्रात मोदींनी चांगले काम केले आहे. तर राज्यात  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आहे. आता दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आणि कार्यकर्ते एकजूट होऊन लढतील आणि विजयी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv Senaशिवसेना