शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:50 IST

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

पुणे -  ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी देशाच्या धोरणात्मक संस्कृती-जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांबाबत विचार मांडले.

‘आपण यापूर्वी न स्वीकारलेले वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. भूतकाळात पर्याय आणि विचार प्रक्रिया अस्तित्वात होती. पण आता आपल्या स्वतःच्या नोंदींचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकविध संकल्पना आपल्या संस्कृतीत आहेत, पण आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे,’ असेही एस. जयशंकर म्हणाले. 

  डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘परराष्ट्र धोरणासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण महत्त्वाची आहे. यात पुण्यासह सिम्बायोसिस महत्त्वाचे योगदान देत आहे.’ यावेळी कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण आणि डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

परराष्ट्रीय धोरण अनियंत्रित घटकांवर अवलंबूनएस. जयशंकर म्हणाले, ‘परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरविणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे. अर्थात, परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात.’

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरsymbiosisसिंबायोसिसPuneपुणे