शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:50 IST

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

पुणे -  ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी देशाच्या धोरणात्मक संस्कृती-जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांबाबत विचार मांडले.

‘आपण यापूर्वी न स्वीकारलेले वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. भूतकाळात पर्याय आणि विचार प्रक्रिया अस्तित्वात होती. पण आता आपल्या स्वतःच्या नोंदींचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकविध संकल्पना आपल्या संस्कृतीत आहेत, पण आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे,’ असेही एस. जयशंकर म्हणाले. 

  डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘परराष्ट्र धोरणासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण महत्त्वाची आहे. यात पुण्यासह सिम्बायोसिस महत्त्वाचे योगदान देत आहे.’ यावेळी कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण आणि डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

परराष्ट्रीय धोरण अनियंत्रित घटकांवर अवलंबूनएस. जयशंकर म्हणाले, ‘परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरविणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे. अर्थात, परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात.’

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरsymbiosisसिंबायोसिसPuneपुणे